शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

संशोधनाभिमुख शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 5:00 AM

चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर व चंद्रपूर जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत चंद्र्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जिल्हास्तरीय इंस्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये संशोधनाला अधिक महत्त्व देणे गरजेचे असून आजचे शिक्षण हे संशोधनाभिमुख होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर व चंद्रपूर जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत चंद्र्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले तर प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष रेखा कारेकर, सैनिक शाळेचे स्क्रॉडन लिडर प्राचार्य नरेश कुमार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्रकाश देवतळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (निरंतर) मोहन पवार आदी उपस्थित होते. ना. वडेट्टीवार पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती जोपासावी. समाजाचे व्यापक हित लक्षात घेणारे संशोधन करावे. कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असून यातून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा. नासामध्ये गेलेले भारतीय आपले संशोधन जगाला दाखवू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना विदेशी संस्थांची मदत घ्यावी लागते. देशपातळीवर आपले पेटंट व्हावी, आपल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली पाहिजे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले. याशिवाय हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी उपक्रमाची विद्यार्थ्यांनी कशी गरज आहे, याबाबत मार्गदर्शन केले. आभार हु.नो. मस्के यांनी मानले. यावेळी मान्यवर, विद्यार्थी व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.विजेत्या विद्यार्थ्याला ५१ हजारांचा पुरस्कारस्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मॉडेल सादर करण्याची संधी भेटणार आहे. जिल्ह्यात विद्यार्थी यशस्वी झाल्यास ५१ हजारांचा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सैनिक शाळेच्या आरक्षणात ओबीसी विद्यार्थ्यांनाही प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी दिली. सैनिक विद्यालयातील हे नाविण्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन २२ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.चांदा ते बांदा योजना सुरूच राहणारचंद्र्रपूर व सिंधुदुर्ग या मागास जिल्ह्यांमध्ये परंपरागत उद्योग व कृषीवर आधारित जोडधंद्यांना चालना देऊन लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी तयार करण्यात आली. ही योजना यापुढेही सुरू राहणार आहे. योजना बंद करण्यात आल्याची अफवा असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नंदोरी येथील पशु प्रदर्शनच्या उद्घाटनानंतर सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. चांदा ते बांदा ही योजना बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. या योजनेतंर्गत चार वर्षांत जिल्ह्यात २०० दोनशे कोटींची कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक