शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

मानवावरील वाघाचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

By admin | Updated: February 9, 2017 00:43 IST

सिंदेवाही तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. या तालुक्यात शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्राचा समावेश आहे.

बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. या तालुक्यात शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. नुकतेच शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघिणीने धुमाकूळ घालून दोन महिला व एका पुरुषावर हल्ला करून ठार केले तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होणे स्वाभाविक आहे. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघीणीला पकडा असा आदेश वन अधिकाऱ्याला दिले तर ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मागील दोन वर्षांपासून शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ व बिबट यांच्याकडून मानवावर हल्ल्याच्या घटनात वाढ होत आहे. भयभीत जनता आणि वनविभाग यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु, मानवाकडून वाघाचे खाद्यान्न व आश्रय स्थळ नष्ट होत आहेत. त्यामुळे वाघ व बिबट यांनाही जीवन जगावे कसे, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात निसर्गाने घनदाट जंगल उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व प्रकारची वन औषधी, वनफळे, इमारती लाकूड, बांबू व वन्यप्राणी या वनविभागात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी काही टक्के वनक्षेत्र वनविकास महामंडळाच्या ताब्यात आहे. अलिकडच्या काळात वन्य प्राण्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात वाघ व बिबट यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांची भटकंती सुरू असते. या भटकंती दरम्यान वाघाच्या तावडीत कधी-कधी पाळीव जनावरांची शिकार होत आहे. लोकांचाही वावर जंगलात वाढत असल्याने वाघाचे दर्शन ग्रामीण भागात नित्याचेच झाले आहे. सरपणासाठी गेलेल्या महिला किंवा गुणे चारणाऱ्या गुराख्यावर वाघ कधी-कधी हल्ला चढवितो. याला काही मानवी चुका कारणीभूत ठरत आहे.वनपरिक्षेत्रात दरवर्षी वनविभाग व वनविकास महामंडळाकडून रोपवनाचे कामे केली जातात. रोपवनाच्या नावाखाली नैसर्गिक घनदाट जंगलातील झाडे तोडली जातात तसेच दुर्मिळ वन औषधी, वनफळे, मोह, टेंभूर्णी व आवळा यासारख्या मौल्यवान झाडे सर्रासपणे तोडली जात आहेत. ही वनफळे अस्वल, चित्तर, सांबर व माकड यासारख्या वन्यप्राण्याची भूक भागविते तर झुडपी, गवती झाडे तोडल्याने निलगाय, रानगवे, ससा, जंगली डुक्कर आदी वन्य प्राण्याची उपासमार होत आहे. रोपवनासाठी जंगल सफाई होत असल्याने घणदाट जंगल विरळ होत आहे. कुकडरांजीची झाडे गोलाकार आकाराची असून आतमध्ये पोकळी राहते. त्याठिकाणी वन्य प्राण्याचे आश्रय स्थळ होते. परंतु सुरगाडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना परमिट देवून वनविभागाने कुकडरांजीच्या झाडाची कत्तल केली. साग रोपवनामुळे त्या क्षेत्रातील इतर गवती वनस्पतीची वाढ होत नाही. सागर झाडापासून कोणत्याही वन्य प्राण्यांना खाद्य मिळत नाही. फळ वर्गीय झाडाची कमतरतेमुळे प्राणी गावाकडे कुच करीत आहेत.