शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मानवावरील वाघाचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

By admin | Updated: February 9, 2017 00:43 IST

सिंदेवाही तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. या तालुक्यात शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्राचा समावेश आहे.

बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. या तालुक्यात शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. नुकतेच शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघिणीने धुमाकूळ घालून दोन महिला व एका पुरुषावर हल्ला करून ठार केले तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होणे स्वाभाविक आहे. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघीणीला पकडा असा आदेश वन अधिकाऱ्याला दिले तर ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मागील दोन वर्षांपासून शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ व बिबट यांच्याकडून मानवावर हल्ल्याच्या घटनात वाढ होत आहे. भयभीत जनता आणि वनविभाग यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु, मानवाकडून वाघाचे खाद्यान्न व आश्रय स्थळ नष्ट होत आहेत. त्यामुळे वाघ व बिबट यांनाही जीवन जगावे कसे, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात निसर्गाने घनदाट जंगल उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व प्रकारची वन औषधी, वनफळे, इमारती लाकूड, बांबू व वन्यप्राणी या वनविभागात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी काही टक्के वनक्षेत्र वनविकास महामंडळाच्या ताब्यात आहे. अलिकडच्या काळात वन्य प्राण्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात वाघ व बिबट यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांची भटकंती सुरू असते. या भटकंती दरम्यान वाघाच्या तावडीत कधी-कधी पाळीव जनावरांची शिकार होत आहे. लोकांचाही वावर जंगलात वाढत असल्याने वाघाचे दर्शन ग्रामीण भागात नित्याचेच झाले आहे. सरपणासाठी गेलेल्या महिला किंवा गुणे चारणाऱ्या गुराख्यावर वाघ कधी-कधी हल्ला चढवितो. याला काही मानवी चुका कारणीभूत ठरत आहे.वनपरिक्षेत्रात दरवर्षी वनविभाग व वनविकास महामंडळाकडून रोपवनाचे कामे केली जातात. रोपवनाच्या नावाखाली नैसर्गिक घनदाट जंगलातील झाडे तोडली जातात तसेच दुर्मिळ वन औषधी, वनफळे, मोह, टेंभूर्णी व आवळा यासारख्या मौल्यवान झाडे सर्रासपणे तोडली जात आहेत. ही वनफळे अस्वल, चित्तर, सांबर व माकड यासारख्या वन्यप्राण्याची भूक भागविते तर झुडपी, गवती झाडे तोडल्याने निलगाय, रानगवे, ससा, जंगली डुक्कर आदी वन्य प्राण्याची उपासमार होत आहे. रोपवनासाठी जंगल सफाई होत असल्याने घणदाट जंगल विरळ होत आहे. कुकडरांजीची झाडे गोलाकार आकाराची असून आतमध्ये पोकळी राहते. त्याठिकाणी वन्य प्राण्याचे आश्रय स्थळ होते. परंतु सुरगाडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना परमिट देवून वनविभागाने कुकडरांजीच्या झाडाची कत्तल केली. साग रोपवनामुळे त्या क्षेत्रातील इतर गवती वनस्पतीची वाढ होत नाही. सागर झाडापासून कोणत्याही वन्य प्राण्यांना खाद्य मिळत नाही. फळ वर्गीय झाडाची कमतरतेमुळे प्राणी गावाकडे कुच करीत आहेत.