शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मानवावरील वाघाचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

By admin | Updated: February 9, 2017 00:43 IST

सिंदेवाही तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. या तालुक्यात शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्राचा समावेश आहे.

बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. या तालुक्यात शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. नुकतेच शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघिणीने धुमाकूळ घालून दोन महिला व एका पुरुषावर हल्ला करून ठार केले तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होणे स्वाभाविक आहे. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघीणीला पकडा असा आदेश वन अधिकाऱ्याला दिले तर ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मागील दोन वर्षांपासून शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ व बिबट यांच्याकडून मानवावर हल्ल्याच्या घटनात वाढ होत आहे. भयभीत जनता आणि वनविभाग यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु, मानवाकडून वाघाचे खाद्यान्न व आश्रय स्थळ नष्ट होत आहेत. त्यामुळे वाघ व बिबट यांनाही जीवन जगावे कसे, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात निसर्गाने घनदाट जंगल उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व प्रकारची वन औषधी, वनफळे, इमारती लाकूड, बांबू व वन्यप्राणी या वनविभागात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी काही टक्के वनक्षेत्र वनविकास महामंडळाच्या ताब्यात आहे. अलिकडच्या काळात वन्य प्राण्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात वाघ व बिबट यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांची भटकंती सुरू असते. या भटकंती दरम्यान वाघाच्या तावडीत कधी-कधी पाळीव जनावरांची शिकार होत आहे. लोकांचाही वावर जंगलात वाढत असल्याने वाघाचे दर्शन ग्रामीण भागात नित्याचेच झाले आहे. सरपणासाठी गेलेल्या महिला किंवा गुणे चारणाऱ्या गुराख्यावर वाघ कधी-कधी हल्ला चढवितो. याला काही मानवी चुका कारणीभूत ठरत आहे.वनपरिक्षेत्रात दरवर्षी वनविभाग व वनविकास महामंडळाकडून रोपवनाचे कामे केली जातात. रोपवनाच्या नावाखाली नैसर्गिक घनदाट जंगलातील झाडे तोडली जातात तसेच दुर्मिळ वन औषधी, वनफळे, मोह, टेंभूर्णी व आवळा यासारख्या मौल्यवान झाडे सर्रासपणे तोडली जात आहेत. ही वनफळे अस्वल, चित्तर, सांबर व माकड यासारख्या वन्यप्राण्याची भूक भागविते तर झुडपी, गवती झाडे तोडल्याने निलगाय, रानगवे, ससा, जंगली डुक्कर आदी वन्य प्राण्याची उपासमार होत आहे. रोपवनासाठी जंगल सफाई होत असल्याने घणदाट जंगल विरळ होत आहे. कुकडरांजीची झाडे गोलाकार आकाराची असून आतमध्ये पोकळी राहते. त्याठिकाणी वन्य प्राण्याचे आश्रय स्थळ होते. परंतु सुरगाडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना परमिट देवून वनविभागाने कुकडरांजीच्या झाडाची कत्तल केली. साग रोपवनामुळे त्या क्षेत्रातील इतर गवती वनस्पतीची वाढ होत नाही. सागर झाडापासून कोणत्याही वन्य प्राण्यांना खाद्य मिळत नाही. फळ वर्गीय झाडाची कमतरतेमुळे प्राणी गावाकडे कुच करीत आहेत.