शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

निरोगी जीवनासाठी हवी सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:28 IST

दुचाकी बाईकवरून सुसाट वेगाने थरार अनुभवणाऱ्या युवा पिढीला सायकल चालविण्यात कमीपणा वाटण्याचे दिवस आता बदलत आहेत. बदलाची ही गती मंद असली तरी तरुणांच्या नव्या कल्पना आणि नवे स्वप्न लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण सायकली बाजारात उपलब्ध होत असल्याने चंद्रपूर शहरातही रोड बाईक, माऊंटन एमपीबी, हायबर्ड,माऊंटन सायकलींनी विद्यार्थ्यांना भुरळ घातल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतरुणाईला हायबर्ड माऊंटन सायकलचे वेड : ज्येष्ठ नागरिकांचीही सायकलींना पसंतीसायकल दिन विशेष

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुचाकी बाईकवरून सुसाट वेगाने थरार अनुभवणाऱ्या युवा पिढीला सायकल चालविण्यात कमीपणा वाटण्याचे दिवस आता बदलत आहेत. बदलाची ही गती मंद असली तरी तरुणांच्या नव्या कल्पना आणि नवे स्वप्न लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण सायकली बाजारात उपलब्ध होत असल्याने चंद्रपूर शहरातही रोड बाईक, माऊंटन एमपीबी, हायबर्ड,माऊंटन सायकलींनी विद्यार्थ्यांना भुरळ घातल्याचे दिसून येत आहे.चाकाचा शोध लागल्यानंतर औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. चाकामुळे मानवी जीवनाला गती मिळाली. पायाला चाकाचा आधार मिळताच माणसाचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. आता तर महागड्या दुचाकी व वाहनांचा जमाना आला. नुकतेच पंख फुटलेले विद्यार्थीदेखील बाईकनेच शाळा- महाविद्यालयात जातात. काही श्रीमंत पालकांचा अपवाद वगळ्यास बहुतेक पालकांनी इयत्ता पाच ते दहावीपर्यंतच्या पाल्यांना सायकल घेऊन देतात. ‘बाईक नको, तु सायकलीनेच शाळेत जा’ असा सल्ला देत पाल्यांचा आनंद वाढवितात. सायकल उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. साध्या सायकलींचे रुपडे पालटले. २५ पेक्षा अधिक सायकलींचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास काही मोठ्या दुकानांमध्ये रोडबाईक, रेंजर, माऊंटन बाईक अर्थात एमटीबी सायकलची चलती आहे. याशिवाय टुरिंग बाईक्स, फोल्डींग एक्स्ट्रीम, ग्रीअर, सस्पेशन्स असेही प्रकार आढळतात. खाली वाकलेले हॅन्डल, सिल्कबॉडी आणि रांगडा टायर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतो. जाड टायरमुळे खाचखळग्याच्या रस्त्यावरूहन ही सायकल जोमाने दामटता येते. काही वर्षांपूर्वी स्टिल फ्रेमच्या सायकली चंद्रपुरात येत होत्या. पण बदलत्या आवडीनिवडीनुसार सायकलींचे आकार बदलले. अनेक सायकलींमध्ये आता कॉर्बन फायबर वापरण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. फायब्ररची किमत अधिक असली तरी वजनाने हलके आहे. त्यामुळे तरुणाई ‘हीच सायकल घेऊन द्या’ या शब्दात तगादा पालकांकडे लावतात. मानवी शक्तीद्वारे पायांना गती देऊन चालणारे सायकल वापरणाऱ्यांची संख्या हायस्कूलपर्यंत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणही चंद्रपुरात लक्षवेधी आहे. एका सरळ रेषेत बसवलेली दोन चाके, लोखंडी पातळ त्रिकोणाकृती चौकट, बैठकीचा तोल गती सांभाळणारी शीट, दोन पायडल त्याला लागणारे ब्रेक यामध्ये कल्पनेच्या पलिकडील बदल घडून आले आहेत. जेवढी वाकडी सायकल तेवढा मोठा आनंद, अशी मानसिकता झाली आहे. अत्याधुनिक व नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन सायकल खरेदी कराव्या लागतात. मोठी आर्थिक गुंतवणूक लागते. डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च करणाऱ्यांना सायकलचे महत्त्व कळूनही त्याकडे वळणाºयांची संख्या वाढली पाहिजे. बरेच डॉक्टरर्स स्वत: सायकल वापरतात. पण, रुग्णांना ही उपयोगिता पटवून देत नाही, अशी खंतही एका व्यावसायिकाने व्यक्त केली.सायकलवरील कर कमी करावापर्यावरणाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हा खर्च व्हायलाच पाहिजे. पण, सायकलचे महत्त्व कदापि टाळता येत नाही. बाईक व कार वापरणाºयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, प्रदुषणाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. चंद्रपूर शहरातील नागरिक विविध जीवघेण्या आजारांचा सामना करीत आहेत. जिथे-जिथे शक्य आहे, अशा ठिकाणी सायकल वापरल्यास प्रदूषणाची तीव्रता कमी होईल. त्यासाठी सायकल विके्रत्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले पाहिजे. सायकलींवर १२ टक्के कर लावला जातो. सरकारने हा कर कमी करावी, अशी मागणी सायकल व्यावसायिक विनोद रेगुंडवार यांनी केली.प्रतिष्ठा महत्त्वाची की आरोग्य?सायकल वापरल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. आजारांमुळे हैराण झालेल्या रुग्णांना सायकलपासून अनेक लाभ मिळतात. निरोगी जगण्यासाठी सायकलचे महत्त्व समजूनही तथाकथित प्रतिष्ठेमुळे सायकल अडगळीत पडली.आरोग्यासाठी अडगळीतील सायकली बाहेर काढाव्याचंद्रपूर शहरातील अनेक कुटुंबींयाकडे एकतरी सायकल हमखास आहे. मात्र या सायकली अडगळीत पडल्या आहे. बहुतेकांनी सायकल सोडून बाईक वापरणे सुरू केले. युवक-युवती दुचाकी बाईक वरुनच महाविद्यालयात जाणाऱ्यांची संख्या वाढली. सायकल म्हटले की, नाक मुरडतात. बदलत्या काळानुसार काही पालकांनी नव्या सायकली विकत घेऊन पाल्यांची मानसिकता घडवित आहेत. पण ही संख्या कमी आहे. ग्रामीण भागामध्ये सायकली नसल्याने अनके विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत पायी शाळेत जावे लागते. त्यामुळे अडगळीत पडलेल्या सायकलींची दुरुरस्ती करुन दुर्गम, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना भेट देण्याची मोहीम सुरू केल्यास त्यांची पाऊले विकासाचे गतीने झेपावतील.सायकलची कुळकथाएम. डी. सिव्हर्क या फ्रेंच व्यक्तीने १६९० मध्ये सायकलची संकल्पना जन्मास घातली. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसून स्वप्न पूर्ण केले. त्याने तयार केलेल्या सायकलीला एका दांड्याने जोडलेली दोन लाकडी चाके होती. दांड्यावर दोन्ही बाजूने पाय सोडून बसावे लागत होते. पायाने जमिनीला रेटा दिल्यानंतर हे सायकल पुढे जात असे. त्यानंतर १८१६ बॅरन कार्ल द ड्रेस सोअरब्रुन यांनी हे वाहन इच्छेप्रमाणे वळविण्यासाठी पुढच्या चाकावर हॅन्डल बसविले. पण, ही सायकल पायाने रेटूनच चालवावी लागत होती. १८४० मध्ये पुढच्या चाकाच्या आसाला पायाने फिरविता येईल, असे क्रॅक (भूजा) बसविण्याची सुधारणा झाली. १८७६ मध्ये एच. जे. लॉसन यांनी पॅडल व साखळी वापरुन मागच्या चालकाला गती देण्याची पद्धत सुरु केली. सायकलच्या जगात १८८७ मध्ये जॉन बॉइड डनलॉप यांनी रबरी टायर सुरू केल्याने क्रांती घडली. त्यानंतरचा इतिहास आज जगासमोर आहे.