शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

बाबासाहेबांच्या विचारांसाठी लढा उभारण्याची गरज

By admin | Updated: January 31, 2015 23:17 IST

गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला,

चंद्रपूर : गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला, शोषित, पिडीत जनतेला मानवमुक्ती देवून संपूर्ण विश्वात प्रस्थापितांनी समाजात निर्माण केलेली विषमता दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विश्वात पोहचविण्यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते बुद्धीस्ट समन्वय कृती समितीद्वारा आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेच्या ‘फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नाही’ या विषयावरील प्रबोधन सत्राच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.बुद्धीस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद आणि उपवर-वधू परिचय मेळावा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार चंद्रपूर, भिमराव जुनघरे आलापल्ली, प्रकाश गावंडे, विलासराव बनकर, विद्याधर लाडे, अ‍ॅड. अवधुत मांगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी अर्चना घोडेस्वार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नसल्याचे स्पष्ट करून आपण वेळ, पैसा आणि बुद्धी खर्ची घालून नवसमाज घडविण्याचे कार्य करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. प्रास्ताविक वंदना जांभुळकर, संचालन अजय गणवीर व आभार राहूल देशपांडे यांनी मानले. यावेळी हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)