शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

दारुबंदीच्या अमंलबजावणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:32 IST

दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दारुबंदी रोखण्यासाठी कठोर अमंलबजावणीची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री संजय देवतळे यांनी केले.धनगर समाज संघटनेच्या वतीने नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, डॉ. विजय देवतळे, संजय बोधे, जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष प्राचार्य गजानन शेळके, तहसीलदार बोडखे, डॉ. कपिल टोंगे, मनिष जेठाणी, बंडू डाखरे, अ‍ॅड. जयंत ठाकरे, प्रा. पिसे, रुपलाल कावळे, पडवे, राजेंद्र मर्दाने आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विजय देवतळे म्हणाले, जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाकडे वळला असून आता गुन्हेगारी नवीन रूप घेत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी सबधित विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. तर अ‍ॅड. टेमुर्डे म्हणाले, सद्यास्थितीत कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारातसुद्धा वाढ झाली आहे. अवैध दारुविक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.तर लक्ष्मण गमे म्हणाले, छत्रपती चिडे यांच्यावर गुन्हेगारांना पकडताना मरणाची वेळ येणे, ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याचे सांगितले. तर गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दारू तस्करांना रोखण्याचा यापुढे प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य शेळके यांनी छत्रपती चिडे यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडत त्याचे स्मारक बांधण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन पंडीत लोंढे यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी