शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

दारुबंदीच्या अमंलबजावणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:32 IST

दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दारुबंदी रोखण्यासाठी कठोर अमंलबजावणीची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री संजय देवतळे यांनी केले.धनगर समाज संघटनेच्या वतीने नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, डॉ. विजय देवतळे, संजय बोधे, जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष प्राचार्य गजानन शेळके, तहसीलदार बोडखे, डॉ. कपिल टोंगे, मनिष जेठाणी, बंडू डाखरे, अ‍ॅड. जयंत ठाकरे, प्रा. पिसे, रुपलाल कावळे, पडवे, राजेंद्र मर्दाने आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विजय देवतळे म्हणाले, जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाकडे वळला असून आता गुन्हेगारी नवीन रूप घेत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी सबधित विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. तर अ‍ॅड. टेमुर्डे म्हणाले, सद्यास्थितीत कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारातसुद्धा वाढ झाली आहे. अवैध दारुविक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.तर लक्ष्मण गमे म्हणाले, छत्रपती चिडे यांच्यावर गुन्हेगारांना पकडताना मरणाची वेळ येणे, ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याचे सांगितले. तर गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दारू तस्करांना रोखण्याचा यापुढे प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य शेळके यांनी छत्रपती चिडे यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडत त्याचे स्मारक बांधण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन पंडीत लोंढे यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी