शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवरगाव आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:02 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.

ठळक मुद्देमंजूर पदे भरण्याची मागणी : विविध संवर्गातील १३ पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.सिंदेवाही तालुक्यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय तर यावरच जास्त भार पडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य नवरगाव, गुंजेवाही, मोहाळी व प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा असे तालुक्यात चार विभाग करण्यात आले आहे. नवरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत रत्नापूर, पेंढरी, मिनघरी, खातगाव, पळसगाव (जाट) असे उपकेंद्र जोडले आहेत. मात्र उपकेंद्रामध्ये विशेष सोयी व डॉक्टर नसल्याने त्या-त्या ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जात असतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणाºया रुग्णांची संख्या दिवेसंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.नवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावांचा समावेश असून ४०-५० हजार लोकसंख्या आहे. इतका भार या केंद्रावर असताना वैद्यकीय अधिकारी दोन पदे मंजूर असून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. औषधी संयोजकाचे पद रिक्त आहे. परिचराची चार पदे मंजूर असून दोनच कार्यरत आहेत. आरोग्य सेवक पाच पदे मंजूर असताना तीन पदे रिक्त आहेत. आरोग्यसेविका व लिपीक ही पदेही रिक्त असून अशी १३ पदे रिक्त आहेत.नवरगाव हे तालुक्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसºया क्रमांकाचे गाव आहे. शिवाय या केंद्राजवळ देलनवाडी धुमनखेडा, रत्नापूर, गिरगाव, आलेसूर, नैनपूर, नाचनभट्टी, मिनघरी, उमरवाही अशी विविध गावेही आहेत. एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने कधी सुट्टीवर असल्यास शिवाय वेळोवेळी तालुकास्तरावर जिल्हाभरावर आरोग्य विभागाच्या मिटिंग कार्यक्रम असतात. अशावेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहू शकत नाही. तेव्हा रुग्ण उपचारासाठी तसेच महिला प्रसुतीसाठी किंवा एखादा रुग्ण इमर्जन्सी असल्यास तारांबळ उळते. अशावेळी दोन वैद्यकीय अधिकाºयांची गरज आहे.रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथील विविध रिक्त असलेली पदे आरोग्य विभागाने त्वरीत भरावी आणि या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.