शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नवरगाव आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:02 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.

ठळक मुद्देमंजूर पदे भरण्याची मागणी : विविध संवर्गातील १३ पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र येथे अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे.सिंदेवाही तालुक्यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय तर यावरच जास्त भार पडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य नवरगाव, गुंजेवाही, मोहाळी व प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा असे तालुक्यात चार विभाग करण्यात आले आहे. नवरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत रत्नापूर, पेंढरी, मिनघरी, खातगाव, पळसगाव (जाट) असे उपकेंद्र जोडले आहेत. मात्र उपकेंद्रामध्ये विशेष सोयी व डॉक्टर नसल्याने त्या-त्या ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जात असतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणाºया रुग्णांची संख्या दिवेसंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.नवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावांचा समावेश असून ४०-५० हजार लोकसंख्या आहे. इतका भार या केंद्रावर असताना वैद्यकीय अधिकारी दोन पदे मंजूर असून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. औषधी संयोजकाचे पद रिक्त आहे. परिचराची चार पदे मंजूर असून दोनच कार्यरत आहेत. आरोग्य सेवक पाच पदे मंजूर असताना तीन पदे रिक्त आहेत. आरोग्यसेविका व लिपीक ही पदेही रिक्त असून अशी १३ पदे रिक्त आहेत.नवरगाव हे तालुक्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसºया क्रमांकाचे गाव आहे. शिवाय या केंद्राजवळ देलनवाडी धुमनखेडा, रत्नापूर, गिरगाव, आलेसूर, नैनपूर, नाचनभट्टी, मिनघरी, उमरवाही अशी विविध गावेही आहेत. एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने कधी सुट्टीवर असल्यास शिवाय वेळोवेळी तालुकास्तरावर जिल्हाभरावर आरोग्य विभागाच्या मिटिंग कार्यक्रम असतात. अशावेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहू शकत नाही. तेव्हा रुग्ण उपचारासाठी तसेच महिला प्रसुतीसाठी किंवा एखादा रुग्ण इमर्जन्सी असल्यास तारांबळ उळते. अशावेळी दोन वैद्यकीय अधिकाºयांची गरज आहे.रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथील विविध रिक्त असलेली पदे आरोग्य विभागाने त्वरीत भरावी आणि या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.