शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

राष्ट्रीय महामार्ग ठरला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:05 IST

उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देवाट काढणेही कठीण : कासवगतीचे चौपदरीकरण ठरतेय अडचणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.उन्हाळ्याच्या काळात मार्गावरून सर्वत्र उडण्याऱ्या धुराची समस्या होती. आता पावसाळ्यात चिखलामुळे वाहनचालकांना वाट शोधणेच कठीण झालेले आहे.महामार्गाच्या एका बाजूस गिट्टी पसरवली आहे. मात्र त्यावर प्रेसिंग करण्यात आलेली नाही. परिणामी ती गिट्टी सर्वत्र विखुरली आहे. तर दुसरी बाजू वाहनांसाठी चालू आहे. या पर्यायी मार्गाच्या तुलनेत काम सुरू असलेला मार्ग खूपच उंच आहे. थोडासाही पाऊस आला तर पर्यायी मार्गावर पाणी साचते व या पाण्याचा निचरा होत नाही.यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. आणि या चिखलातून वाट काढणे वाहन चालकांसाठी कठीण ठरत आहे.दुचाकीने प्रवास करणे तर कसरत केल्यासारखेच झाले आहे. प्रवासादरम्यान चारचाकी वाहन बाजूने गेले तर साचलेले सर्व चिखलाच पाणी दुचाकी चालकांच्या अंगावर उडत असते. अशा चिखलयुक्त मार्गावर वाहन स्लिप होणे, रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, असे प्रकार दररोज घडत आहेत. याच बाजूने प्रवास करताना सावध प्रवास करावा लागत आहे.जर बाजूने मोठे वाहन वेगाने गेल्यास पसरलेली गिट्टी उसळून लागण्याची शक्यता दाट शक्यता आहे. अशावेळी वाहनचालक गंभीर जखमी होऊ शकतो. यासारख्या अनेक समस्या या मार्गावर उद्भवत आहेत. अलिकडच्या काळात बेंबाळ गावाजवळ पावसामुळे चक्क रस्ता वाहून गेला.परिणामी एक दिवस पूर्ण महामार्गाच बंद करण्यात आला होता. या महामार्गाच्या चौपदरीकरणाची गती अतिशय मंद स्वरूपाची आहे. त्यामुळे आणखी किती काळ असा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागेल हे सांगणे कठीण आहे.विशेष म्हणजे, याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात जडवाहनांचीही वाहतूक होते. या मार्गावर वाहने रस्त्यात साचलेल्या चिखलामुळे अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पर्यायी मार्ग दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.