शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग ठरला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:05 IST

उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देवाट काढणेही कठीण : कासवगतीचे चौपदरीकरण ठरतेय अडचणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.उन्हाळ्याच्या काळात मार्गावरून सर्वत्र उडण्याऱ्या धुराची समस्या होती. आता पावसाळ्यात चिखलामुळे वाहनचालकांना वाट शोधणेच कठीण झालेले आहे.महामार्गाच्या एका बाजूस गिट्टी पसरवली आहे. मात्र त्यावर प्रेसिंग करण्यात आलेली नाही. परिणामी ती गिट्टी सर्वत्र विखुरली आहे. तर दुसरी बाजू वाहनांसाठी चालू आहे. या पर्यायी मार्गाच्या तुलनेत काम सुरू असलेला मार्ग खूपच उंच आहे. थोडासाही पाऊस आला तर पर्यायी मार्गावर पाणी साचते व या पाण्याचा निचरा होत नाही.यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. आणि या चिखलातून वाट काढणे वाहन चालकांसाठी कठीण ठरत आहे.दुचाकीने प्रवास करणे तर कसरत केल्यासारखेच झाले आहे. प्रवासादरम्यान चारचाकी वाहन बाजूने गेले तर साचलेले सर्व चिखलाच पाणी दुचाकी चालकांच्या अंगावर उडत असते. अशा चिखलयुक्त मार्गावर वाहन स्लिप होणे, रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, असे प्रकार दररोज घडत आहेत. याच बाजूने प्रवास करताना सावध प्रवास करावा लागत आहे.जर बाजूने मोठे वाहन वेगाने गेल्यास पसरलेली गिट्टी उसळून लागण्याची शक्यता दाट शक्यता आहे. अशावेळी वाहनचालक गंभीर जखमी होऊ शकतो. यासारख्या अनेक समस्या या मार्गावर उद्भवत आहेत. अलिकडच्या काळात बेंबाळ गावाजवळ पावसामुळे चक्क रस्ता वाहून गेला.परिणामी एक दिवस पूर्ण महामार्गाच बंद करण्यात आला होता. या महामार्गाच्या चौपदरीकरणाची गती अतिशय मंद स्वरूपाची आहे. त्यामुळे आणखी किती काळ असा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागेल हे सांगणे कठीण आहे.विशेष म्हणजे, याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात जडवाहनांचीही वाहतूक होते. या मार्गावर वाहने रस्त्यात साचलेल्या चिखलामुळे अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पर्यायी मार्ग दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.