शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

राष्ट्रीय महामार्ग ठरला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:05 IST

उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देवाट काढणेही कठीण : कासवगतीचे चौपदरीकरण ठरतेय अडचणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.उन्हाळ्याच्या काळात मार्गावरून सर्वत्र उडण्याऱ्या धुराची समस्या होती. आता पावसाळ्यात चिखलामुळे वाहनचालकांना वाट शोधणेच कठीण झालेले आहे.महामार्गाच्या एका बाजूस गिट्टी पसरवली आहे. मात्र त्यावर प्रेसिंग करण्यात आलेली नाही. परिणामी ती गिट्टी सर्वत्र विखुरली आहे. तर दुसरी बाजू वाहनांसाठी चालू आहे. या पर्यायी मार्गाच्या तुलनेत काम सुरू असलेला मार्ग खूपच उंच आहे. थोडासाही पाऊस आला तर पर्यायी मार्गावर पाणी साचते व या पाण्याचा निचरा होत नाही.यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. आणि या चिखलातून वाट काढणे वाहन चालकांसाठी कठीण ठरत आहे.दुचाकीने प्रवास करणे तर कसरत केल्यासारखेच झाले आहे. प्रवासादरम्यान चारचाकी वाहन बाजूने गेले तर साचलेले सर्व चिखलाच पाणी दुचाकी चालकांच्या अंगावर उडत असते. अशा चिखलयुक्त मार्गावर वाहन स्लिप होणे, रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, असे प्रकार दररोज घडत आहेत. याच बाजूने प्रवास करताना सावध प्रवास करावा लागत आहे.जर बाजूने मोठे वाहन वेगाने गेल्यास पसरलेली गिट्टी उसळून लागण्याची शक्यता दाट शक्यता आहे. अशावेळी वाहनचालक गंभीर जखमी होऊ शकतो. यासारख्या अनेक समस्या या मार्गावर उद्भवत आहेत. अलिकडच्या काळात बेंबाळ गावाजवळ पावसामुळे चक्क रस्ता वाहून गेला.परिणामी एक दिवस पूर्ण महामार्गाच बंद करण्यात आला होता. या महामार्गाच्या चौपदरीकरणाची गती अतिशय मंद स्वरूपाची आहे. त्यामुळे आणखी किती काळ असा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागेल हे सांगणे कठीण आहे.विशेष म्हणजे, याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात जडवाहनांचीही वाहतूक होते. या मार्गावर वाहने रस्त्यात साचलेल्या चिखलामुळे अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पर्यायी मार्ग दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.