शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा मोदीमंत्र गडचांदुरात पोहोचलाच नाही

By admin | Updated: November 11, 2014 22:38 IST

सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर

गडचांदूर : सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर परिषद स्थापन झाली. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वच्छेचा मंत्र दिला. मात्र, नागरिकांची घोर निराशाच झाली आहे. प्रत्येक वॉर्ड समस्याग्रस्त असून त्यांचा मंत्र पोहचलाच नाही, असेच दिसत आहे.गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, मुरली अ‍ॅग्रो व अंबुजा असे चार सिमेंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्व वाढण्यास कारखान्यांचा महत्वाचा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक इथे रोजगाराच्या दृष्टीने वास्तव्यास आहेत. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आही. गडचांदुरातील येथील नागरिक कधीच संघटीत होऊन कोणत्याही समस्यांविषयी आवाज उठवित नाही. शहरात खुप मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, रस्त्याने चालताना किंवा दुचाकीने फिरताना फार धुळीचा सामना करावा लागतो. मुख्य रस्त्याने सुसाट वेगाने वाहने धावतात, चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशा अनेक समस्या कित्येक वर्षांपासून गडचांदुरवासीयांसमोर आ वासून उभ्या आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्याकरिता कोणताही अधिकारी पाऊले उचलताना दिसत नाही.शहरात ट्रान्सपोर्टचे व्यवसाय असून पोलीस ठाण्याला अगदी लागून आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते. एकाही ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपले ट्रक उभे करण्याची नीट व्यवस्था केलेली नाही. पण हे व्यावसायीक पैशाचा वापर ट्रक उभे करण्याची व्यवस्था करण्याऐवजी पोलिसांचे तोंड बंद करण्याकरिता करतात. त्यामुळे सर्वच ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. एवढेच नाही तर धुळीमुळे तर या रस्त्यांची वाट लागली आहे. दुचाकीस्वारानी वाहन चालवावे कसे? असा प्रश्न या रस्त्याने पडतो. माणिकगड सिमेंट कंपनीने काही दिवस धूळ न उडावी यासाठी पाणी मारण्याचे ढोंग केले. मात्र अल्पावधीतच हा उपक्रम गुंडाळला. त्यामुळे या रस्त्याने किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. मात्र सामान्य माणूस इथे होरपळला जात आहे. माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात. याच मार्गावरून शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या ट्रकांमुळे याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नवीन ठाणेदार आले की चार दिवस आपला दरारा दाखवितात व नंतर जैसे थे ! हीच परिस्थिती आजपर्यंत गडचांदूरवासीयांनी अनुभवली आहे. परिसरात वाहनांमध्ये केरोसीनचा सर्रास वापर होते. अवैध वाहतूक सुद्धा जोमात चालते. भंगार चोरही मोठ्या प्रमाणात आहेत. शहरात भंगारचे व्यवसाय थाटात चालते. (शहर प्रतिनिधी)