शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

स्वच्छतेचा मोदीमंत्र गडचांदुरात पोहोचलाच नाही

By admin | Updated: November 11, 2014 22:38 IST

सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर

गडचांदूर : सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर परिषद स्थापन झाली. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वच्छेचा मंत्र दिला. मात्र, नागरिकांची घोर निराशाच झाली आहे. प्रत्येक वॉर्ड समस्याग्रस्त असून त्यांचा मंत्र पोहचलाच नाही, असेच दिसत आहे.गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, मुरली अ‍ॅग्रो व अंबुजा असे चार सिमेंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्व वाढण्यास कारखान्यांचा महत्वाचा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक इथे रोजगाराच्या दृष्टीने वास्तव्यास आहेत. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आही. गडचांदुरातील येथील नागरिक कधीच संघटीत होऊन कोणत्याही समस्यांविषयी आवाज उठवित नाही. शहरात खुप मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, रस्त्याने चालताना किंवा दुचाकीने फिरताना फार धुळीचा सामना करावा लागतो. मुख्य रस्त्याने सुसाट वेगाने वाहने धावतात, चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशा अनेक समस्या कित्येक वर्षांपासून गडचांदुरवासीयांसमोर आ वासून उभ्या आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्याकरिता कोणताही अधिकारी पाऊले उचलताना दिसत नाही.शहरात ट्रान्सपोर्टचे व्यवसाय असून पोलीस ठाण्याला अगदी लागून आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते. एकाही ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपले ट्रक उभे करण्याची नीट व्यवस्था केलेली नाही. पण हे व्यावसायीक पैशाचा वापर ट्रक उभे करण्याची व्यवस्था करण्याऐवजी पोलिसांचे तोंड बंद करण्याकरिता करतात. त्यामुळे सर्वच ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. एवढेच नाही तर धुळीमुळे तर या रस्त्यांची वाट लागली आहे. दुचाकीस्वारानी वाहन चालवावे कसे? असा प्रश्न या रस्त्याने पडतो. माणिकगड सिमेंट कंपनीने काही दिवस धूळ न उडावी यासाठी पाणी मारण्याचे ढोंग केले. मात्र अल्पावधीतच हा उपक्रम गुंडाळला. त्यामुळे या रस्त्याने किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. मात्र सामान्य माणूस इथे होरपळला जात आहे. माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात. याच मार्गावरून शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या ट्रकांमुळे याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नवीन ठाणेदार आले की चार दिवस आपला दरारा दाखवितात व नंतर जैसे थे ! हीच परिस्थिती आजपर्यंत गडचांदूरवासीयांनी अनुभवली आहे. परिसरात वाहनांमध्ये केरोसीनचा सर्रास वापर होते. अवैध वाहतूक सुद्धा जोमात चालते. भंगार चोरही मोठ्या प्रमाणात आहेत. शहरात भंगारचे व्यवसाय थाटात चालते. (शहर प्रतिनिधी)