शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नंदोरीची वीरकन्या लढतेयं बांगला सीमेवर

By admin | Updated: May 11, 2015 01:01 IST

नंदोरी हे एक बऱ्यापैकी खेडे. या मातीतील अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून नामवंत झाले आहेत.

विनेशचंद्र मांडवकर नंदोरीनंदोरी हे एक बऱ्यापैकी खेडे. या मातीतील अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून नामवंत झाले आहेत. हा या गावाचा अभिमानच. भद्रावती पंचायत समितीचे माजी सभापती रमेश लांबट यांची सुपुत्री जयश्री रमेश लांबट हिनेही गावाची ही परंपरा कायम राखली आहे. स्त्री असतानाही अगदी सीमा सुरक्षा दलात जाऊन बांगला सीमेवर शत्रूंशी लढा देत आहे. तिच्या या देशसेवा नंदोरीलाही नावलौकिक मिळवून दिले आहे. जयश्री लांबट हिचा स्वभाव बालपणापासूनच मनमिळावू. तिला मैत्रिणीही असंख्य. मैत्रिणीसोबतच खेळायची, अभ्यासही करायची. परंतु इतरांपेक्षा वेगळे करण्याची जिज्ञासा तिच्या मनात नेहमीच होती. सोबत देशसेवेचेही आवड. स्त्री असल्यामुळे आपली ही आवड पूर्ण होईल का, असा विचार तिच्या मनात कधीच आला नाही. अनेक तरुण सैन्यात संरक्षण खात्यात सेवा देतात, म्हणूनच आपण निवांत झोपू शकतो, हे तिला ठाऊक होते. सीमा सुरक्षा दलात जाण्याचा ध्यास जयश्रीने घेतला. स्त्री ही शक्तीस्वरूप असल्याचा प्रत्यय देत थेट बीएसएफ (बार्डर सिक्युरीटी फोर्स) तिने नोकरी पत्करली. सैन्यभरती प्रक्रियेवर अवघड चाचण्या, व्यायाम, सराव, अभ्यास यात केवळ जिज्ञासेपोटी स्वत:स झोकून द्यायची. आई-वडिलांनी व भावडांनी सैन्यात जाण्यास सुरुवातीस विरोध केला. परंतु देशसेवाच करायची, असे या विरकन्येने ठरविले होते. जिवापाड प्रेम करणाऱ्या आईवडिलांना व भावडांना समजावत तिने निर्णय घेतला व अथक परिश्रमाने सराव करीत सर्व चाचण्या यशस्वीरित्या तिने पूर्ण केल्या. अवघ्या २२ व्या वर्षी जयश्री सीमा सुरक्षा दलात दाखल झाली. सोबतच जयश्रीने आपले उच्च शिक्षणही पूर्ण केले.आज जयश्री आगरतला फटीचरा-रायमोर येथे आसाम प्रातांत तैनात आहे. नुकतीच धाकट्या बहिणीच्या विवाहाकरिता नंदोरी येथे स्वगावी आली. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने तिची भेट घेत बोलते केले. सैन्यात जाण्याची प्रेरणा कशी मिळाली, या प्रश्नावर जयश्री म्हणाली, ‘शहीद योगेश डाहुले’ यांच्या बलिदानाने आपल्याला ही प्रेरणा मिळाली. ती म्हणते केवळ तरुणांनीच देशसेवेत स्वत:ला धोकून द्यायचे का ? तरुणींनी यात समोर आले पाहिजे. ‘ तु जमीन कर, आसमान कर, अपने जिंदगी का नया इतिहास कर, खुद जिंदगी तेरे सामने है, हर एक कदम पर विश्वास कर’ हे काव्य तिला बळ देत असल्याचेही तिने आवर्जुन सांगितले. कुठलेही काम मनावर घेतले तर मुली ते काम करून दाखवितातच. कोणतेही काम करताना अंगी जिद्द असावी, असेही ती म्हणते. सीमेवरील अनुभव सांगताना जयश्री म्हणाली, आपल्याला त्रिपुरामध्ये नलकट्टा येथे प्रारंभी खूप त्रास झाला. मलेरियाची साथ, डासांचा प्रचंड प्रादुर्भाव, अवजड राईफल, अवजारे, सतत युनिफार्म, जंगल, जाडजुड बुट, तेव्हा आपले घर, गाव आठवायचे. परंतु देशाकरिता आपणाला काहीतरी करण्याची संधी मिळाली याची नंतर जाणीव व्हायची आणि पुन्हा देशसेवा करताना नवा उत्साह यायचा. जयश्रीने उच्च शिक्षणही घेतले आहे. परंतु तिला इतरत्र कुठेही नोकरी करायची नाही. जयश्रीला शाळा कॉलेजातील ते मुक्त जीवन आठवते. परंतु आज आपण एका नियमांच्या चाकोरीत कर्तव्य बंधनात बांधलो आहोत, याचीही तिला जाणीव आहे. किरण बेदी, पंजाबच्या मुख्यमंत्र्याचे आपल्याला मार्गदर्शन मिळाल्याचे ती सांगते. त्यांच्या मार्गदर्शनाने आपणास नवी स्फूर्ती मिळाल्याचेही तिने लोकमतशी बोलताना सांगितले.‘जीवनात निदान एक काम असे करा, ज्याने तुमचे स्मरण हे जग पुन्हा पुन्हा करेल’ असा संदेशही जयश्रीने दिला आहे.