शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मनपाचे पार्किंग झोन ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:17 IST

चंद्रपूरकरांना पाचवीलाच पूजलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात चार ठिकाणी वाहनतळ निर्माण केले.

ठळक मुद्देवाहतूक कोंडी कायम : रस्त्यावरच बेलगाम पार्किंग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरकरांना पाचवीलाच पूजलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात चार ठिकाणी वाहनतळ निर्माण केले. या पार्किंग झोनमध्ये शहरात येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क होतील आणि वाहतूक कोंडी सुटेल, अशी आशा होती. मात्र मनपाने वाहन पार्क करण्यासाठी शुल्क ठेवले असल्याने नागरिकांनी या वाहनतळांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी वाहने रस्त्यावरच उभी दिसत असून वाहतूक कोंडीही कायम आहे.चंद्रपूरला औद्योगिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. औद्योगिक विकासामुळे चंद्रपूरच्या लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. वाहन ही आजच्या काळातील मूलभत गरज झाली आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही भरमसाठ वाढत आहे. मागील तीन वर्षातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास वाहनांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत रस्ते मात्र इंचभरही वाढले नाही. वाहने वाढण्याची गती बघता वाहतूक व्यवस्थेत आता आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे अपघाताचीही संख्या वाढून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडू शकतो.चंद्रपूरची लोकसंख्या साडे चार लाखांच्या जवळपास आहे. लोकसंख्या वाढल्याने शहरे गजबजली. जागा अपुरी पडू लागल्याने अतिक्रमण होऊ लागले. यावर प्रशासनाला वेळीच नियंत्रण आणता आले नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अतिक्रमण व गजबजलेल्या लोकवस्त्यांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.एकीकडे रस्ते अरुंद होत असताना दुसरीकडे वाहनांची संख्या मात्र लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या उदयास येऊ लागली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी वाहतूक व्यवस्थेत मात्र बदल झालेला नाही. शहरातील कोणत्याही रस्त्याची अवस्था सुधारलेली नाही. महानगरपालिका अस्तित्वात आली असली तरी टाऊन प्लॅनिंगनुसार रस्त्याचे बांधकाम अद्याप झालेले नाही. कस्तुरबा आणि महात्मा गांधी हे चंद्रपुरातील प्रमुख रस्ते आहेत. मात्र या रस्त्यांवर दोन मोठी चारचाकी वाहने गेली तरी वाहतुकीची बोंब होते. चंद्रपुरात आॅटोरिक्षा, स्कूलबस, दुचाकी, चारचाकी वाहने भरमसाठ वाढल्याने वाहतुकीची कोंडी शहरातील प्रत्येक रस्त्यांवर झालेली दिसून येते. ही वाहतूक कोंडी सुटावी म्हणून महापालिकेने गांधी चौक, आझाद गार्डन, महात्मा गांधी शाळा व राजे धर्मराव शाळा या ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केले. मात्र या ठिकाणी वाहन ठेवण्यासाठी मनपाकडून शुुल्क आकारले जाते. चारचाकी वाहनांसाठी प्रति तीन तास २० रुपये व दुचाकी वाहनांकरिता प्रति तीन तास १० रुपये, असे शुल्क आहे. परंतु हे शुल्क देऊन वाहन पार्क करण्यास नागरिक अनुच्छुक दिसून येत आहेत. त्यामुळे सध्या ही वाहनतळे ओस पडलेली दिसतात. दुसरीकडे रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांची पूर्वीसारखीच गर्दी दिसते. त्यामुळे महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, जटपुरा गेट, आझाद बागेच्या बाजुला, गोकूल गल्ली, गांधी चौक, छोटा बाजार आदी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.कारवाई करा, अन्यथा शुल्क हटवावाहनतळ सोडून दिवसभर रस्त्यावर अस्ताव्यस्त ठेवलेल्या प्रत्येक वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई करणे गरजेचे आहे. वारंवार असे होत राहिले तर आपसुकच रस्त्यावर वाहने पार्क करणे नागरिक टाळतील. कारण तिथेही आर्थिक भुर्दंड बसेल. अन्यथा दुसरा पर्याय अधिकृत वाहनतळावरील शुल्क हटविणे. शुल्क नसेल तर नागरिक तिथेच वाहन पार्क करतील. या दोन्ही प्रकारांपैकी एक प्रकार अमलात आला तर नक्की वाहतूक कोंडी कमी होईल.६८ हजारांचीच कमाईमनपाच्या या चार पार्र्कींग झोनमधील प्रत्येक वाहनांकडून २० रुपये आणि १० रुपये प्रति तीन तासांसाठी घेतले जातात. तरीही मागील तीन महिन्यात या चारही वाहनतळांमधून मनपाला केवळ ६८ हजार ४९० रुपयांचीच कमाई झाली आहे. वास्तविक या वाहनतळाच्या आजुबाजुलाच दररोज शेकडो वाहने उभी दिसतात. यावरून नागरिक किती उदासीन आहेत, हे दिसून येते.