शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे पार्किंग झोन ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:17 IST

चंद्रपूरकरांना पाचवीलाच पूजलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात चार ठिकाणी वाहनतळ निर्माण केले.

ठळक मुद्देवाहतूक कोंडी कायम : रस्त्यावरच बेलगाम पार्किंग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरकरांना पाचवीलाच पूजलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात चार ठिकाणी वाहनतळ निर्माण केले. या पार्किंग झोनमध्ये शहरात येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क होतील आणि वाहतूक कोंडी सुटेल, अशी आशा होती. मात्र मनपाने वाहन पार्क करण्यासाठी शुल्क ठेवले असल्याने नागरिकांनी या वाहनतळांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी वाहने रस्त्यावरच उभी दिसत असून वाहतूक कोंडीही कायम आहे.चंद्रपूरला औद्योगिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. औद्योगिक विकासामुळे चंद्रपूरच्या लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. वाहन ही आजच्या काळातील मूलभत गरज झाली आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही भरमसाठ वाढत आहे. मागील तीन वर्षातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास वाहनांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत रस्ते मात्र इंचभरही वाढले नाही. वाहने वाढण्याची गती बघता वाहतूक व्यवस्थेत आता आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे अपघाताचीही संख्या वाढून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडू शकतो.चंद्रपूरची लोकसंख्या साडे चार लाखांच्या जवळपास आहे. लोकसंख्या वाढल्याने शहरे गजबजली. जागा अपुरी पडू लागल्याने अतिक्रमण होऊ लागले. यावर प्रशासनाला वेळीच नियंत्रण आणता आले नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अतिक्रमण व गजबजलेल्या लोकवस्त्यांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.एकीकडे रस्ते अरुंद होत असताना दुसरीकडे वाहनांची संख्या मात्र लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या उदयास येऊ लागली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी वाहतूक व्यवस्थेत मात्र बदल झालेला नाही. शहरातील कोणत्याही रस्त्याची अवस्था सुधारलेली नाही. महानगरपालिका अस्तित्वात आली असली तरी टाऊन प्लॅनिंगनुसार रस्त्याचे बांधकाम अद्याप झालेले नाही. कस्तुरबा आणि महात्मा गांधी हे चंद्रपुरातील प्रमुख रस्ते आहेत. मात्र या रस्त्यांवर दोन मोठी चारचाकी वाहने गेली तरी वाहतुकीची बोंब होते. चंद्रपुरात आॅटोरिक्षा, स्कूलबस, दुचाकी, चारचाकी वाहने भरमसाठ वाढल्याने वाहतुकीची कोंडी शहरातील प्रत्येक रस्त्यांवर झालेली दिसून येते. ही वाहतूक कोंडी सुटावी म्हणून महापालिकेने गांधी चौक, आझाद गार्डन, महात्मा गांधी शाळा व राजे धर्मराव शाळा या ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केले. मात्र या ठिकाणी वाहन ठेवण्यासाठी मनपाकडून शुुल्क आकारले जाते. चारचाकी वाहनांसाठी प्रति तीन तास २० रुपये व दुचाकी वाहनांकरिता प्रति तीन तास १० रुपये, असे शुल्क आहे. परंतु हे शुल्क देऊन वाहन पार्क करण्यास नागरिक अनुच्छुक दिसून येत आहेत. त्यामुळे सध्या ही वाहनतळे ओस पडलेली दिसतात. दुसरीकडे रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांची पूर्वीसारखीच गर्दी दिसते. त्यामुळे महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, जटपुरा गेट, आझाद बागेच्या बाजुला, गोकूल गल्ली, गांधी चौक, छोटा बाजार आदी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.कारवाई करा, अन्यथा शुल्क हटवावाहनतळ सोडून दिवसभर रस्त्यावर अस्ताव्यस्त ठेवलेल्या प्रत्येक वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई करणे गरजेचे आहे. वारंवार असे होत राहिले तर आपसुकच रस्त्यावर वाहने पार्क करणे नागरिक टाळतील. कारण तिथेही आर्थिक भुर्दंड बसेल. अन्यथा दुसरा पर्याय अधिकृत वाहनतळावरील शुल्क हटविणे. शुल्क नसेल तर नागरिक तिथेच वाहन पार्क करतील. या दोन्ही प्रकारांपैकी एक प्रकार अमलात आला तर नक्की वाहतूक कोंडी कमी होईल.६८ हजारांचीच कमाईमनपाच्या या चार पार्र्कींग झोनमधील प्रत्येक वाहनांकडून २० रुपये आणि १० रुपये प्रति तीन तासांसाठी घेतले जातात. तरीही मागील तीन महिन्यात या चारही वाहनतळांमधून मनपाला केवळ ६८ हजार ४९० रुपयांचीच कमाई झाली आहे. वास्तविक या वाहनतळाच्या आजुबाजुलाच दररोज शेकडो वाहने उभी दिसतात. यावरून नागरिक किती उदासीन आहेत, हे दिसून येते.