शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

स्वच्छता अ‍ॅपचा प्रसार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:11 IST

सध्या देशात स्वच्छतेसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानासंदर्भात विविध पुरस्कारही देण्यात येते. यासाठी महापालिकांसह नगरपरिषदाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असून प्रथम क्रमांकासाठी चढाओढ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपथकांद्वारे वार्डावार्डात प्रचार : नागरिकांच्या संपर्क क्रमांकाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता अभियानामध्ये राज्यातच नाही तर देशात अव्वल स्थानी येण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात शहराची स्वच्छता केली जात आहे. तरीही नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पथकांचे गठण करण्यात आले असून पथकाद्वारे वार्डावार्डात फिरून माहिती देण्यात येत आहे.सध्या देशात स्वच्छतेसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानासंदर्भात विविध पुरस्कारही देण्यात येते. यासाठी महापालिकांसह नगरपरिषदाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असून प्रथम क्रमांकासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून भद्रावती नगरपरिषदेने पुरस्कार पटकाविल्यानंतर इतर नगरपरिषदा आणि चंद्रपूर महानगरपालिकेनेही आता स्वच्छता मोहीम अधिक व्यापक राबविण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रार केल्यास २४ तासामध्ये स्वच्छता करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र अ‍ॅपद्वारे तक्रार करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने आणि शासनाचा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी स्वच्छता अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोजली जात असल्यामुळे आता मनपाने त्यादृष्टीने प्रयत्न करणे सुरु केले आहे. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करवून घेतले जात आहे.नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचास्वच्छता अ‍ॅपचा वापर करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. अ‍ॅपद्वारे कचºयासंदर्भात तक्रार केल्यास २४ तासाच्या आत संबंधित कर्मचारी तो कचरा उचलणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वच्छता अ‍ॅपचा वापर करणे गरजेचे आहे.