शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

गौरक्षण वॉर्डात विविध समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST

बल्लारपूर: शहरातील मुख्य मार्गावर लागून असलेल्या दत्त मंदिरापासून ते सरकारी अनाज भांडारपर्यंतच्या परिसरात अनेक वर्षांपासून लोकांची घरे असून ...

बल्लारपूर: शहरातील मुख्य मार्गावर लागून असलेल्या दत्त मंदिरापासून ते सरकारी अनाज भांडारपर्यंतच्या परिसरात अनेक वर्षांपासून लोकांची घरे असून त्यांना वीज, पाणी, गटाराचे पाणी जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. समस्या त्वरित सोडविण्यात यावी म्हणून आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे.

गौरक्षण वाॅर्डातील परिसरात खूप ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नगरपरिषदेने केली नाही. याशिवाय रस्तेही खूप खराब, घाण पाणी जाण्यासाठीसुद्धा नाल्याची व्यवस्था नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरत आहे. वीज खांब नसल्यामुळे येथील नागरिकांना रात्री-बेरात्री जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. परंतु, नगरपरिषद या परिसरातील नागरिकांकडून मालमत्ताकर बरोबर वसूल करते व कोणत्याही प्रकारची सुविधा देत नाही आणि साफसफाईसुद्धा केली जात नाही. या परिसरातील लोकांनी वेळोवेळी नगरसेवकाच्या माध्यमातून नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले, तरीसुद्धा या परिसराकडे कोणीही लक्ष देत नाहीत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे जनतेला खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरात करोडो रुपये खर्च करून काही ठिकाणी सिमेंट रोड बनविले जात आहेत, पण जिथे गरज आहे तिथे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जनहितासाठी आम आदमी पार्टीने गौरक्षण वाॅर्डातील समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली आहे, अन्यथा या विषयाला घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदन देताना अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, अफजल अली, ॲड. पवन वैरागडे, आसिफ शेख, नीलेश जाधव, शुभम जगताप, सुधाकर गेडाम, आदर्श नारायणदास, इर्शाद अली, महिलाएं अध्यक्ष अल्का वेले यांची उपस्थिती होती.

100921\img-20210910-wa0290.jpg

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन देताना आप चे कार्यकर्ते