शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

अवकाळी पावसाने एका रात्रीत केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला.

ठळक मुद्देजिल्हाभरात मोठे नुकसान : आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. अशातच अवकाळी पाऊसही हजेरी लावत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारी रात्रीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. सातत्याने ढगाळ वातावरण आणि अधेमधे पाऊस बरसत असल्याने गहू, हरभरा, तूर आदी रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. खरीप हंगामातील धान आणि कापसाचेही नुकसान झाले आहे.खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसत आहे. रबी पिके आठवडाभरापूर्वी चांगली भरात आली होती. मात्र अचानक वातावरणात बदल झाला आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभरातच जोरदार पाऊस बरसला. किमान अर्धा-एक तास हा पाऊस कायम राहिला. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आणखी पाऊस बरसला.या पावसामुळे खरीपातील धान, कापूस आणि रबीतील सर्व पिकांना जोरदार फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे. अकाली पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहेत. कृषी विभागाने सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी आहे.नागरिकांच्या आरोग्यावरही परिणामसातत्याने ढगाळ वातावरण आणि अकाली पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे. सूर्यानेही नागरिकांना दर्शन देणे कमी केले आहे. सकाळपासून सुरू झालेले ढगाळ वातावरण रात्रीपर्यंत कायम राहत आहे. केव्हा सूर्यादय होतो आणि केव्हा मावळतो, हेच कळेणासे झाले आहे.भाजीपाला पिकाचेही नुकसानभद्रावती, वरोरा, सिंदेवाही, नागभीड या तालुक्यात बऱ्यापैकी भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. अनेकांच्या वाड्या आहेत. मात्र बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. याशिवाय भद्रावती तालुक्यात गाराही पडल्या. त्यामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.ढगाळ वातावरणामुळे थंडी कमीचंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी कडाक्याची थंडी पडू लागली होती. पारा चक्क ५.१ अंशापर्यंत घसरला होता. त्यामुळे आता जानेवारी महिना संपेपर्यंत अशीच थंडी कायम राहील, असे वाटले होते. मात्र ढगाळ वातावरणाने थंडीचा जोर कमी करून टाकला आहे. सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने पारा वाढला आहे. बुधवारी तापमान १६.६ अंशापर्यंत आले.

टॅग्स :Rainपाऊस