शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नाणेबंदची अफवा अन् नागरिकांची गैरसोय

By admin | Updated: January 2, 2017 00:51 IST

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी

नागरिकांचा सवाल : कोण म्हणतो दहाचे नाणे बंद झाले ? चंद्रपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी मेटाकुटीस आले आहेत. व्यापार, बाजारपेठेत व्यवहार व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच आता दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. सरकारकडून वा प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नसताना व्यावसायिकांकडून केवळ अफवांवर विश्वास ठेवून नाणे घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे आता नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम होत असून नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. चंद्रपूर शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ही अफवा पसरली आहे. ती कोणी वा कोणत्या उद्देशाने पसरविली, हेदेखील एक कोडेच आहे. मात्र यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील व्यवहार खोळंबले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबरला १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या निर्णयामुळे चलण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेत नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातील बहुतांश जनतेने आपल्याकडे असलेल्या नोटा बँकेत जमा केल्या. त्या मोबदल्यात दोन हजार रुपयांच्या नोटा मिळविल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या चिल्लरसाठी नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे. अशातच आता पंतप्रधानांनी नागरिकांना मागितलेले ५० दिवसही संपले आहेत. तरीही चलनटंचाई व बँकेतील नागरिकांच्या रांगा तशाच कायम आहे. एटीएम केंद्रावरही अशीच परिस्थिती आहे. अनेकांनी बँकांमधून पैसे काढताना दहा रुपयांचे नाणेसुद्धा देण्यात आले. मात्र आता १० रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्यामुळे अनेक व्यापारी व छोटेमोठे व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे नागरिकांजवळ असलेले १० रुपयांच्या नाण्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी व्यावसायिकांची समजूत काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला. मात्र, व्यावसायिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. दहा रुपयांच्या नाण्याबाबत भ्रामक कल्पना पसरविल्या जात आहे. या सर्व भानगडीत ग्रामीण भागातील जनता भरडली जात आहे. पूर्वीची चलनटंचाई व नाणेबंदीच्या अफवेने व्यवहारावर मोठा परिणाम होत आहे.आता जिल्हा प्रशासनानेच यावर तोडगा काढून वेगाने पसरत चाललेली अफवा थांबवावी व व्यावसायिकांची समजूत काढावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)