शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

नाणेबंदची अफवा अन् नागरिकांची गैरसोय

By admin | Updated: January 2, 2017 00:51 IST

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी

नागरिकांचा सवाल : कोण म्हणतो दहाचे नाणे बंद झाले ? चंद्रपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी मेटाकुटीस आले आहेत. व्यापार, बाजारपेठेत व्यवहार व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच आता दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. सरकारकडून वा प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नसताना व्यावसायिकांकडून केवळ अफवांवर विश्वास ठेवून नाणे घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे आता नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम होत असून नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. चंद्रपूर शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ही अफवा पसरली आहे. ती कोणी वा कोणत्या उद्देशाने पसरविली, हेदेखील एक कोडेच आहे. मात्र यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील व्यवहार खोळंबले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबरला १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या निर्णयामुळे चलण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेत नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातील बहुतांश जनतेने आपल्याकडे असलेल्या नोटा बँकेत जमा केल्या. त्या मोबदल्यात दोन हजार रुपयांच्या नोटा मिळविल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या चिल्लरसाठी नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे. अशातच आता पंतप्रधानांनी नागरिकांना मागितलेले ५० दिवसही संपले आहेत. तरीही चलनटंचाई व बँकेतील नागरिकांच्या रांगा तशाच कायम आहे. एटीएम केंद्रावरही अशीच परिस्थिती आहे. अनेकांनी बँकांमधून पैसे काढताना दहा रुपयांचे नाणेसुद्धा देण्यात आले. मात्र आता १० रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्यामुळे अनेक व्यापारी व छोटेमोठे व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे नागरिकांजवळ असलेले १० रुपयांच्या नाण्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी व्यावसायिकांची समजूत काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला. मात्र, व्यावसायिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. दहा रुपयांच्या नाण्याबाबत भ्रामक कल्पना पसरविल्या जात आहे. या सर्व भानगडीत ग्रामीण भागातील जनता भरडली जात आहे. पूर्वीची चलनटंचाई व नाणेबंदीच्या अफवेने व्यवहारावर मोठा परिणाम होत आहे.आता जिल्हा प्रशासनानेच यावर तोडगा काढून वेगाने पसरत चाललेली अफवा थांबवावी व व्यावसायिकांची समजूत काढावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)