शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:17 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय २० गावांत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानाच्या कक्षा ...

ठळक मुद्देगावखेड्यांत जागर : २० गावांमध्ये सुरू झाले पालकमंत्री कृषी वाचनालय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय २० गावांत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची संधी मिळाली आहे.पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकाभिमुख उपक्रमांतून विकासकामांना चालना मिळाली. शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ना. मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेऊन काही लक्षवेधी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. चंद्रपूर, मूल, बल्लारपूर आणि पोंभूर्णा चार तालुक्यांतील २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय करण्यास पुढाकार घेतला.चंद्रपूर तालुक्यातील मामला, चेक निंबाळा, शिवणी चोर, मूल तालुक्यातील चिचाळा, उथळपेठ, बोरचांदली, नांदगाव, भवराळा, हळदी, दाबगाव, गडीसुर्ला, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव, चेक बल्लारपूर, घाटकुळ, पिपरी देशपांडे, आंबेधानोरा, उमरी पोतदार, आष्टा, नवेगाव मोर आणि बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव आदी २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात १०० पुस्तकांचा एक संच उपलब्ध करण्यात आला. ही सर्व पुस्तके कृषी विषयक मार्गदर्शन करणारी आहेत. विविध प्रकारची खते व बियाण्यांची माहिती, नवनवे पीक कसे घ्यायचे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी वाचनालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कृषी उत्पन्नवाढीला चालनापालकमंत्री कृषी वाचनालयातील पुस्तकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाची माहिती गावातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर प्रबोधनसभा तसेच प्रचार व प्रसाराचे कार्य नियमितपणे सुरू राहणार आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या लोकोपयोगी उपक्रमामुळे कृषी उत्पन्न वाढीला चालना मिळणार आहे.