शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:17 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय २० गावांत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानाच्या कक्षा ...

ठळक मुद्देगावखेड्यांत जागर : २० गावांमध्ये सुरू झाले पालकमंत्री कृषी वाचनालय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय २० गावांत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची संधी मिळाली आहे.पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकाभिमुख उपक्रमांतून विकासकामांना चालना मिळाली. शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ना. मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेऊन काही लक्षवेधी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. चंद्रपूर, मूल, बल्लारपूर आणि पोंभूर्णा चार तालुक्यांतील २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय करण्यास पुढाकार घेतला.चंद्रपूर तालुक्यातील मामला, चेक निंबाळा, शिवणी चोर, मूल तालुक्यातील चिचाळा, उथळपेठ, बोरचांदली, नांदगाव, भवराळा, हळदी, दाबगाव, गडीसुर्ला, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव, चेक बल्लारपूर, घाटकुळ, पिपरी देशपांडे, आंबेधानोरा, उमरी पोतदार, आष्टा, नवेगाव मोर आणि बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव आदी २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात १०० पुस्तकांचा एक संच उपलब्ध करण्यात आला. ही सर्व पुस्तके कृषी विषयक मार्गदर्शन करणारी आहेत. विविध प्रकारची खते व बियाण्यांची माहिती, नवनवे पीक कसे घ्यायचे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी वाचनालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कृषी उत्पन्नवाढीला चालनापालकमंत्री कृषी वाचनालयातील पुस्तकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाची माहिती गावातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर प्रबोधनसभा तसेच प्रचार व प्रसाराचे कार्य नियमितपणे सुरू राहणार आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या लोकोपयोगी उपक्रमामुळे कृषी उत्पन्न वाढीला चालना मिळणार आहे.