शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मोबाईल ठरत आहे पोलिसांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: September 25, 2014 23:20 IST

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रिद असलेल्या पोलिसांना सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोन डोखेदुखी ठरत आहे.

चंद्रपूर : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रिद असलेल्या पोलिसांना सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोन डोखेदुखी ठरत आहे. अनेकवेळा मनस्तापजनक घटना घडत असल्याने पोलीस कर्मचारी सध्या मोबाईलमुळे जाम त्रस्त झाले आहे.नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहील, अशी शपथत् पोलीस विभागात दाखल होताना प्रत्येक पोलीस कर्मचारी घेत असतो. मात्र त्यानंतरही कौटूंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सतत मानसिक ताणावात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतीही युनियन किंवा पोलीस संघटन नाही. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या समस्या वाढत आहे. गृहमंत्रालय केवळ आश्वासने देवून त्यांचे बोळवण करीत आहे.आता मात्र या कर्मचाऱ्यांना नव्याच समस्येने ग्रासले आहे. मोबाईल फोन जेवढा चांगला ठरत आहे तेवढाच या कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक झाला आहे. विशेष म्हणजे, शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांना मोबाईल सेवा पुरविली नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी मोबाईलवर अनेकवेळा अधिकारी फोन करून बोलावतात. एवढेच नाही तर, त्यांना काही वेळा पोलीसी भाषेत शिविगाळही केली जाते. मात्र मुकाट्याने ऐकल्याशिवाय या पोलीस कर्मचाऱ्यांना इलाज नाही.सदैव तत्पर असलेले पोलीस सुख, दु:खाच्या प्रसंगी आपला मोबाईल बंद ठेवत असेल तर, अशावेळीही त्यांना बोलावून चांगलेच खडसावल्या जात असल्याचा प्रकार अलिकडे वाढला आहे. एखादा पोलीस कर्मचारी सुटीवर असेल किंवा अंत्ययात्रेत सहभागी झाला असेल अशाही वेळी पोलीस अधिकारी त्याला बोलावतात. यामुळे मात्र त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. किमान शासनाने शासकीय मोबाईल तसेच बील देवून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.