शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

रक्तदान शिबिर आयोजित करून मनसेने पार पाडली सामाजिक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्याही रोडावली ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्याही रोडावली आहे. परिणामी जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी लॅबमध्येही रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी भटकावे लागत आहे. रक्ताचा तुडवडा बघता येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जेसीआय बल्लारपूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, असलम खान, बळी शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी जेसीआय बल्लारपूर आरबीटच्या वतीने हितेश नथवानी, विक्रम अरोरा, शिल्पी नथवानी, हरीश मुथा, राजू जोशी व आदींची उपस्थिती होती.

कोरोना संकटामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी बहुतांज जण रक्तदानासाठी समोर येत नाही. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे नागरिक, सामाजिक संस्था, संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी समोर येऊन रक्तदान शिबिर घेतल्यास रक्ताची टंचाई दूर होईल, असे आवाहन मनसेच्या प्रतिमा ठाकूर यांनी केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.