शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

आमदार साहेब, नागभीडकडेही थोडे लक्ष असू द्या...!

By admin | Updated: April 19, 2015 01:16 IST

चिमूर नगर परिषदेचा मार्ग अखेर मोकळा झाला. पण त्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या नागभीडचे काय, असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे.

नागभीड : चिमूर नगर परिषदेचा मार्ग अखेर मोकळा झाला. पण त्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या नागभीडचे काय, असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे. वास्तविक नागभीड नगरपरिषदेची मागणी चिमूरच्या समकालीनच आहे. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चिमूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्याच कार्यक्रमात त्यांनी चिमूर आणि नागभीड येथे नगर परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली होती. त्यानंतर चिमूर सारखेच येथील प्रशासन कामाला लागले होते. आवश्यक सोपस्कार प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले होते.दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. सत्तांतरासोबतच येथील आमदारही बदलले. किर्तीकुमार भांगडिया येथील आमदार झाले. ते चिमूरसारखाच नागभीडला सुद्धा न्याय देतील, असे अपेक्षित असताना त्यांनी चिमूरला प्राधान्यक्रम देवून नागभीडकरांची घोर निराशा केली आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.नागभीड नगर परिषद स्थापनेतील प्रमुख अडसर म्हणजे येथील लोकसंख्या. लोकसंख्येच्या निकषात नागभीड बसत नाही हे जरी खरे असले तरी चिमूरच्या पुर्ततेसाठी जशी आजूबाजूची गावे समाविष्ट करण्यात आली तशीच नागभीडबद्दल करता आले असते. नागभीडच्या आजुबाजूला पाच-सहा किलोमीटर अंतरावर अनेक गावे आहेत. या ागवांना नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करून चिमूर सारखाच न्याय देता आला असता.वास्तविक नागभीड हे शहर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्या मध्यवर्ती आहे. येथे रेल्वेचे जंक्शनही आहे. पण विकासाच्या बाबतीत मात्र कोसो दूर आहे. निदान नगर परिषदेच्या रुपाने नागभीडच्या विकासात काही भर पडेल या अपेक्षित नागभीडकर आहेत. (तालुका प्रतिनिधी)