शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आमदार साहेब, नागभीडकडेही थोडे लक्ष असू द्या...!

By admin | Updated: April 19, 2015 01:16 IST

चिमूर नगर परिषदेचा मार्ग अखेर मोकळा झाला. पण त्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या नागभीडचे काय, असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे.

नागभीड : चिमूर नगर परिषदेचा मार्ग अखेर मोकळा झाला. पण त्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या नागभीडचे काय, असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे. वास्तविक नागभीड नगरपरिषदेची मागणी चिमूरच्या समकालीनच आहे. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चिमूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्याच कार्यक्रमात त्यांनी चिमूर आणि नागभीड येथे नगर परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली होती. त्यानंतर चिमूर सारखेच येथील प्रशासन कामाला लागले होते. आवश्यक सोपस्कार प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले होते.दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. सत्तांतरासोबतच येथील आमदारही बदलले. किर्तीकुमार भांगडिया येथील आमदार झाले. ते चिमूरसारखाच नागभीडला सुद्धा न्याय देतील, असे अपेक्षित असताना त्यांनी चिमूरला प्राधान्यक्रम देवून नागभीडकरांची घोर निराशा केली आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.नागभीड नगर परिषद स्थापनेतील प्रमुख अडसर म्हणजे येथील लोकसंख्या. लोकसंख्येच्या निकषात नागभीड बसत नाही हे जरी खरे असले तरी चिमूरच्या पुर्ततेसाठी जशी आजूबाजूची गावे समाविष्ट करण्यात आली तशीच नागभीडबद्दल करता आले असते. नागभीडच्या आजुबाजूला पाच-सहा किलोमीटर अंतरावर अनेक गावे आहेत. या ागवांना नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करून चिमूर सारखाच न्याय देता आला असता.वास्तविक नागभीड हे शहर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्या मध्यवर्ती आहे. येथे रेल्वेचे जंक्शनही आहे. पण विकासाच्या बाबतीत मात्र कोसो दूर आहे. निदान नगर परिषदेच्या रुपाने नागभीडच्या विकासात काही भर पडेल या अपेक्षित नागभीडकर आहेत. (तालुका प्रतिनिधी)