शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

मिशन परिवर्तन देणार जीवनाला दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:22 IST

योग्य मार्गदर्शन व जीवन जगण्यासाठी कौशल्य विकसित केल्यास गुन्हेगारी वृत्तीला निश्चितपणे आळा बसू शकते. मुख्य समाज प्रवाहात येऊन स्वाभिमानाने जगता येते. याच उद्देशाने जिल्ह्यात ‘मिशन परिवर्तन’ ही मोहीम राबविण्यात येत असून दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपाद पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : पोलीस मुख्यालयात विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : योग्य मार्गदर्शन व जीवन जगण्यासाठी कौशल्य विकसित केल्यास गुन्हेगारी वृत्तीला निश्चितपणे आळा बसू शकते. मुख्य समाज प्रवाहात येऊन स्वाभिमानाने जगता येते. याच उद्देशाने जिल्ह्यात ‘मिशन परिवर्तन’ ही मोहीम राबविण्यात येत असून दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपाद पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये पार पडलेल्या जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.‘मिशन परिवर्तन’ योजनेची सुरुवात केली जात आहे. या कार्यक्रमाकरिता गुन्हा दाखल झालेले दारूविक्रेते तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले होते. या योजनेतून गुन्हेगारी प्रवृत्ती संपुष्ठात आणण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. प्रत्येकाने या संधीचा लाभ घेवून स्वत: व आपल्या कुटुंबीयाचे भविष्य घडवावे. स्वाभिमानाने जीवन जगावे, यावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रमुख मार्गदर्शक किशोर के., जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भय्याजी येरमे उपस्थित होते.किशोर के. यांनी दारूच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. रवींद्र खडसे व स्टेट बँक आॅफ इंडियाचे वित्त विभागीय व्यवस्थापक विजय चितळे यांनी लघु उद्योगाला आवश्यक असणारी साधनसामग्री व त्याकरिता आवश्यक असलेली व्यवसाय कर्ज योजना याविषयी मार्गदर्शन केले.अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनीही विचार मांडले.गुन्हेगारी वृत्ती कायमची नष्ट होऊ शकते, याकरिता संबंधित व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मिशन परिवर्तनाच्या माध्यमातून गुन्हेगारी वृत्तीला निश्चितपणे आळा बसू शकेल, असा आशावाद मुख्य कार्यपालन अधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, रामनगरचे ठाणेदार अशोक कोळी चंद्रपूर शहरचे भगत यांनीही अभियानाचे महत्त्व विषद केले. विपरित परिस्थितीतही व्यक्तीने माणुसकीवर विश्वास ठेवून आयुष्य जगण्याची शिकवण या कार्यक्रमामुळे मिळाली.सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारपोलीस मुख्यालय परिसरात जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त सभासद व पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारोह उत्साहात पार पडला. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पोलीस पाल्यांना करिअरबद्दल मार्गदर्शन केले. चंद्रपूर पोलीस विभागात रूजू झाल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंत जे पोलीस कर्मचारी या पतसंस्थेत सहभागी झाले होते. त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक (गृह) मारुती इंगवले, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक बोडे, सचिव प्रकाश खुटेमाटे, संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस पतसंस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती याप्रसंगी देण्यात आली. संचालन विष्णू नागरगोजे यांनी केले. विकास आलाम यांनी आभार मानले.

टॅग्स :Policeपोलिस