शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वसतिगृहे, स्वाधार योजनेचे मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेत, ओबीसी सेवा संघाचा आरोप

By साईनाथ कुचनकार | Updated: August 30, 2023 17:05 IST

निवेदनाद्वारे दिला आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर : १५ ऑगस्टपासून राज्यभरातील ७२ ओबीसी वसतिगृह सुरू करू, असे आश्वासन सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. मात्र, अजूनही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय ओबीसी वसतिगृह सुरू झाले नाही. अजूनही प्रवेशप्रक्रिया सुरू केली नाही. वसतिगृहासाठी भाड्याने घेतलेल्या इमारती अजूनही समाजकल्याण विभागाने ताब्यात घेतल्या नाहीत. ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणारी स्वाधार योजना लागू नाही. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरल्याचा आरोप ओबीसी सेवा संघाने केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्याची घोषणा केली. मात्र, त्याची अंमलबजावणी करणारा शासकीय आदेशच काढला नाही. महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला. मात्र, त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाची अट टाकण्यात आली. त्यामुळे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अजूनही वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात सरकारच्या, प्रशासनाच्या हालचालींना वेग दिसत नाही. कित्येक विद्यार्थी वसतिगृह सुरू होतील या आशेने शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे. ओबीसी विद्यार्थी वसतिगृह सुरू न झाल्यास कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू शकते.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी कुंभारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांना पाठविण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, प्रा. अनिल डहाके यांनी दिला. शिष्टमंडळात जिल्हा महासचिव ॲड. विलास माथनकर, भाविक येरगुडे, राहुल भोयर, वसंता वडस्कर, प्रा. हितेश मडावी, भास्कर सपाट, प्रा. चंद्रकांत धांडे यांचा समावेश होता.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीchandrapur-acचंद्रपूरStudentविद्यार्थीEducationशिक्षण