शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सुरक्षा रक्षक हटविल्याने लाखोंचा कोळसा चोरी

By admin | Updated: July 13, 2017 00:39 IST

वेकोलि वणी क्षेत्र परिसरात कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांचे टोळके नेहमीच सक्रीय राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि वणी क्षेत्र परिसरात कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्या चोरट्यांचे टोळके नेहमीच सक्रीय राहतात. कोळसा माफीयांच्या आपसी संघर्षात या क्षेत्रात खून सुद्धा झाले होते. वेकोलिचे सुरक्षा रक्षक व खाजगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षक यांची चोवीस तास सुरक्षा असताना सुद्धा कोळसा व लोखंड चोरीवर पायबंद घालण्यास वेकोलि अधिकारी यशस्वी झाले होते. मात्र आता संपूर्ण खाजगी सुरक्षा रक्षकच वेकोलि वणी क्षेत्र परिसरातून काढून टाकले असल्याने कोळसा माफीया व लोखंड चोरी करणाऱ्यांना सर्व मार्ग मोकळे झाले आहे, अशी तक्रार राजू कुकडे यांनी पोलिसांत केली आहे.७ जूनपासून वेकोलि वणी क्षेत्रातील घुग्घुस, निलजई, नायगाव, मुंगोली, कोलगाव व पैनगंगा कोळसा खाणी क्षेत्रातील खाजगी सुरक्षा रक्षकांना कामावरुन कमी केल्याने या क्षेत्रातील कोळसा माफीया व लोखंड चोर सक्रीय झाले आहेत. त्यांनी लाखो रुपयाचा वेकोलिचा माल चोरी केला आहे. मात्र असे असले तरी कोणत्याही वेकोलि अधिकाऱ्यांनी कोळसा व लोहा चोरी विषयी पोलिसांत तक्रार दिली नसल्याने या अगोदर झालेल्या मोठ्या कोळसा चोरीची भरपाई करण्यासाठी किंवा कोळसा चोरीतून लाखो रुपये जमा करण्यासाठी तर खाजगी सुरक्षा रक्षक हटविले नसावे ना, अशी शंका निर्माण होत आहे.राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम लुट होत असताना खाजगी सुरक्षा रक्षक हटवून वेकोलि प्रशासन नेमके काय साध्य करीत आहे. हेच समजायला मार्ग नाही. लाखो रुपयाच्या कोळसा चोरीस वेकोलि अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एसपींना दिलेल्या तक्रारीत राजू कुकडे यांनी केली आहे.