शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

१६ एकरामध्ये मिरचीचे लाखोंचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम अमोद गौरकर शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके ...

मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम

अमोद गौरकर

शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके घेऊन उत्पादन क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही; परंतु शेतपिकाचे बाजारमूल्य ओळखून येथील एका शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीचे उत्पादन घेऊन प्रगती साधली आहे. त्यांची मिरची दिल्लीला रवाना होत आहे.

ही यशोगाथा आहे शंकरपूरपासून जवळच असलेल्या बोरगाव डोये येथील मनिराम वैद्य या ५५ वर्षीय शेतकऱ्याची. २२ एकर त्यांची शेती असून ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते; परंतु पाहिजे तसा लाभ या शेतीतून त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे शेती विकावी की ठेवावी हा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर होता. परंतु यांचा मुलगा राजू वैद्य हे शंकरपूर येथे कृषी केंद्र चालवितात. स्वतः कृषी पदवीधर आहे. त्यांनी बाजारभाव बघितला. हिरवी मिरचीला चांगला बाजारभाव मिळत आहे आणि मागणी भरपूर आहे. याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षे आधी फक्त पाच एकरमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले. या पाच एकरात त्यांना मिरची उत्पादनातून खूप नफा झाला. मिरची पिकाखालील जमीन वाढविली आणि आज तब्बल १६ एकरमध्ये त्यांनी मिरचीचे उत्पादन घेतले आहे आणि त्यातून ७० लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी आतापर्यंत मिळवले आहे. अजून ३० ते ४० लाख रुपयांची मिरचीचे उत्पादन होणार आहे. ही मिरची तोडण्यासाठी परिसरातील २५ किलोमीटरच्या शेतमजुरांना काम मिळाले आहे. रोज त्यांच्या शेतावर १५० ते २०० मजूर काम करीत आहे आणि त्यांची ही मिरची दिल्ली येथील व्यापारी घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. त्यांची ही यशोगाथा पाहून साठगाव, आंबोली, चिचाळा, जवराबोडी, कोलारी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेत आहे आणि त्यांची मिरची या शेतकऱ्याच्या मार्फत दिल्लीला जात आहे.

कोट

पिकाला जो बाजारभाव येतो त्याचा जर अभ्यास केला आणि त्यानुसार जर पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची शेती करता येते. आधुनिकता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, खताचा योग्य वापर आणि सूक्ष्म नियोजन जर केले तर उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभ मिळतो.

-राजू वैद्य, शेतकरी, शंकरपूर