शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१६ एकरामध्ये मिरचीचे लाखोंचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम अमोद गौरकर शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके ...

मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम

अमोद गौरकर

शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके घेऊन उत्पादन क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही; परंतु शेतपिकाचे बाजारमूल्य ओळखून येथील एका शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीचे उत्पादन घेऊन प्रगती साधली आहे. त्यांची मिरची दिल्लीला रवाना होत आहे.

ही यशोगाथा आहे शंकरपूरपासून जवळच असलेल्या बोरगाव डोये येथील मनिराम वैद्य या ५५ वर्षीय शेतकऱ्याची. २२ एकर त्यांची शेती असून ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते; परंतु पाहिजे तसा लाभ या शेतीतून त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे शेती विकावी की ठेवावी हा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर होता. परंतु यांचा मुलगा राजू वैद्य हे शंकरपूर येथे कृषी केंद्र चालवितात. स्वतः कृषी पदवीधर आहे. त्यांनी बाजारभाव बघितला. हिरवी मिरचीला चांगला बाजारभाव मिळत आहे आणि मागणी भरपूर आहे. याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षे आधी फक्त पाच एकरमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले. या पाच एकरात त्यांना मिरची उत्पादनातून खूप नफा झाला. मिरची पिकाखालील जमीन वाढविली आणि आज तब्बल १६ एकरमध्ये त्यांनी मिरचीचे उत्पादन घेतले आहे आणि त्यातून ७० लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी आतापर्यंत मिळवले आहे. अजून ३० ते ४० लाख रुपयांची मिरचीचे उत्पादन होणार आहे. ही मिरची तोडण्यासाठी परिसरातील २५ किलोमीटरच्या शेतमजुरांना काम मिळाले आहे. रोज त्यांच्या शेतावर १५० ते २०० मजूर काम करीत आहे आणि त्यांची ही मिरची दिल्ली येथील व्यापारी घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. त्यांची ही यशोगाथा पाहून साठगाव, आंबोली, चिचाळा, जवराबोडी, कोलारी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेत आहे आणि त्यांची मिरची या शेतकऱ्याच्या मार्फत दिल्लीला जात आहे.

कोट

पिकाला जो बाजारभाव येतो त्याचा जर अभ्यास केला आणि त्यानुसार जर पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची शेती करता येते. आधुनिकता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, खताचा योग्य वापर आणि सूक्ष्म नियोजन जर केले तर उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभ मिळतो.

-राजू वैद्य, शेतकरी, शंकरपूर