शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

धान पिकावर लष्करी अळीचे आक्रमण

By admin | Updated: August 30, 2014 01:20 IST

यावर्षी पोंभुर्णा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून तालुक्यात ४० ते ५० टक्के धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांचे धान पीक करपायला लागले आहेत.

देवाडा (खुर्द) : यावर्षी पोंभुर्णा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून तालुक्यात ४० ते ५० टक्के धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांचे धान पीक करपायला लागले आहेत. उर्वरित पीक काही प्रमाणात तग धरुन असतानाच वाढत्या उन्हामुळे लष्करी अळीने धान पिकावर आक्रमण केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी झालेल्या संततधार पावसाने संपूर्ण परिसरामध्ये कहर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्या संकटातून स्वत:ला सावरत परिसरातील शेतकऱ्यांनी हतबल न होता यावर्षी पुन्हा जोमाने मशागतीला सुरुवात केली. मात्र यावर्षी पुन्हा निसर्ग कोपला. तालुका परिसरामध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात महागडी बिजाई, खत घेऊन रोवणी केली. बँकेचे कर्ज घेऊन पैशाची व्यवस्था केली. रोवणी झाल्यापासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु अजुनपर्यंत वरूणराजाला शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था दिसली नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील संंपूर्ण पिके करपायला लागली आहेत. त्यातच काही पीक तग धरुन असताना त्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने उरले-सुरले पिकही हातून जाण्याची वेळ आल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. लष्करी अळीने एवढे उग्ररुप धारण केले आहे की, धान पिकासह शेतात असणाऱ्या (गवत) तणावरही या अळ्या ताव मारत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा मिळणेही दुरापास्त झाले आहे. परिसरात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत कृषी कार्यालयात संपर्क साधला असता, सध्या औषधी उपलब्ध नसल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले. वरिष्ठस्तरावर औषधीची मागणी करण्यात आली असून औषधी उपलब्ध होताच, ती पुरविण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी स्पष्ट केले. सध्या तालुक्यातील धान पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. लष्करी अळीचा प्रकोप रोखण्यासाठी शेतकरी खासगी कृषी केंद्रातून औषधे घेऊन फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कृषी विभागाने तात्काळ पोंभुर्णा कार्यालयात औषधी साठा उपलब्घ करुन स्थानिक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन चलाख यांनी केली आहे. (वार्ताहर)