शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या माध्यमातून आता ‘बेटी बचाव’चा संदेश

By admin | Updated: August 25, 2016 00:42 IST

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला या वर्षात १२५ वर्षे पूर्ण होत आहेत.

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानातून प्रबोधन : तालुकास्तरासह विभागावर मिळणार पारितोषिकचिमूर : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला या वर्षात १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या टिळकांच्या उद्गाराचे चालु वर्षे हे शतक महोत्सवी वर्षे आहे. या नेत्यांची जीवनगाथा व कार्य विविध माध्यमाद्वारे जनतेपर्यंत प्रामुख्याने तरुणांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने गणेशउत्सव दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. गणेशोत्सव दरम्यानच गणरायांच्या माध्यमातून आता ‘बेटी बचाव’चा संदेश देण्यात येणार आहे.‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ हा उपक्रम येणाऱ्या गणेश उत्सवाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरू केली. या उत्सवादरम्यान शासनाने या वर्षांपासून उपक्रमाद्वारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीयस्तरावर घेण्यात येणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गणेश मंडळास गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदी विषयाबाबत समितीकडून मूल्यांकन करून शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेत्या मंडळास रोख बक्षिसासह गौरव करण्यात येणार आहे.या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेश मंडळांना स्वदेशी, साक्षरता, बेटी-बचाव, व्यसनमुक्ती व जनसंवर्धन यापैकी एका कल्पनेवर आधारीत देखावा करणे आवश्यक राहणार आहे. या स्पर्धेत धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेले मंडळांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता २९ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येणार आहे. सध्या अनेक मानवनिर्मीत समस्या असून या सर्व समस्या माणसाच्या प्रबोधनातूनच कमी होवू शकतात. तर देशात व राज्यात स्त्री भ्रृणहत्या, महिलावरील अत्याचार आजही कमी झाले नाही. त्यामुळे शासन अनेक प्रबोधनाचे उपक्रम राबवित आहे. या वर्षाच्या गणेशोत्सवापासून तर शासनाकडूनन या समस्येच्या जनजागृतीसाठी गणरायाच्या माध्यमातूनच ‘बेटी बचाव’ चा संदेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)असे असणार पुरस्कारविभागीय स्तरावरील प्रथम विजेत्यास दोन लाख रुपये, द्वितीय विजेत्यास एक लाख ५० हजार रुपये तर तृतीय विजेत्यास एक लाख रुपये रोख, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्या मंडळास एक लाख, द्वितीय ७५ हजार, तृतीय ५० हजार रुपये रोख, तालुकास्तर प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार तर तृतीय १० हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.तालुकास्तरीय त्रिसदस्यीय परीक्षण समितीया त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी राहतील. तर तालुक्यातील शाळा महाविद्यालयाचे कला शिक्षक किंवा प्राध्यापक तथा एन.एस.एस.च्या प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती ८ ते १२ सप्टेंबर दरम्यान प्रत्यक्ष भेट देवून शासनाने ठरविल्यानुसार मूल्यांकन करणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील किमान पाच मंडळानी भाग घेणे आवश्यक राहणार आहे. पाच पेक्षा जास्त मंडळे असेल तर तीन पुरस्कार, चार मंडळानी भाग घेतला तर दोन बक्षीस तर तिनच मंडळानी भाग घेतला तर फक्त प्रथम पुरस्कार देण्यात येणार आहे.