शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

जलयुक्त शिवार योजनेची अनेक कामे अपूर्ण

By admin | Updated: June 22, 2017 00:42 IST

अपूऱ्या पाणीसाठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते, पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार अभियान योजना अस्तित्वात आली.

३० जूनच्या आत कामे करा : अधिकाऱ्यांचे निर्देशभोजराज गोवर्धन । लोकमत न्यूज नेटवर्कमूल: अपूऱ्या पाणीसाठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते, पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार अभियान योजना अस्तित्वात आली. सदर योजनेच्या २७९ कामांना मंजूरी मिळाली, लघूसिंचाई जिल्हा परिषद उपविभागाकडे १३ कामे मंजूर होते, त्यापैकी अनेक कामे अपूर्ण आहेत. यामुळे सदर योजनेची अमंलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांनी सदर योजनेचे तिनतेरा वाजविल्याचे दिसून येत आहे.गावागावातील जलसाठ्यात वाढ करण्याच्या दुष्टीने राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार अभियान योजना अमंलात आणली, सदर योजनेअंतर्गत मामा तलाव दुरूस्ती, सिमेंट प्लग बंधारा, लघू पाटबंधाऱ्यांच्या दुरूस्तीच्या कामाव्यतीरिक्त इतरही कामे हाती घेण्यात आली. आजच्या स्थितीत २२७ कामे पूर्ण झालेली आहे. मूल तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या २७९ कामांना मंजूरी मिळालेली आहे. याकामांची अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. असे असतांनाही ३९ कामे प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर १३ कामे रद्द करण्यात आलेले आहे, येथील लघुसिंचाई जिल्हा परिषद उपविभागाकडे यापैकी १३ कामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १० कामे सुरू आहेत. तर ३ कामे रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे.जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत तालुक्यात कामाला सुरूवात करण्यात आली असून यामध्ये कृषी विभागाने १९९ कामांना मंजूरी मिळाली, त्यापैकी १९० कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर ४ कामे सुरू असून ५ कामे रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. तर लघुसिंचाई जिल्हा परिषद उपविभागाने १३ कामापैकी अजुनपर्यंत एकही काम पुर्ण केलेले नाही, उलट तालुक्यातील मामा तलाव दुरूस्ती मुरमाडी, केळझर व पडझरी येथील कामे रद्द करण्यासाठी प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठविलेला आहे.बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देशमूल तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत सन २०१६-१७ च्या आराखड्यानुसार मंजूर कामाबाबत १६ जून रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती, यामध्ये कृषी विभागाने १९० कामे, मनरेगा १५, लघूसिंचाई जिल्हा परिषद उपविभाग ०, लघूपाटबंधारे ६ तर वनविभागाने १६ कामे पूर्ण केलेले आहे. मूल तालुक्यात केवळ लघू पाटबंधारे विभागानेच दिलेले कामे कालावधीत पूर्ण केलेले आहे . तर कृषी विभाग ४, मनरेगा ३, लघूसिंचाई जिल्हा परिषद उपविभाग १० व वनविभाग २२ चे कामे अजूनही अपूर्ण आहेत. अपूर्ण कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी समितीला दिले. पावसाचे दिवस जवळ आलेले असतांनाही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे जलयुक्त शिवार योजनेचे कामे अपुर्ण आहेत. या संबधाने लघूसिंचाई जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.