शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

फेरफार व नवीन परवानगीचे अनेक प्रकरणे धूळ खात

By admin | Updated: December 29, 2015 20:17 IST

नगर परिषद मूल येथील मालमत्ता विभागात फेरफार करण्यासंदर्भात अनेक प्रकरणे धूळखात पडली असून फेरफार केल्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढू शकते.

राजू गेडाम ल्ल मूलनगर परिषद मूल येथील मालमत्ता विभागात फेरफार करण्यासंदर्भात अनेक प्रकरणे धूळखात पडली असून फेरफार केल्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढू शकते. मात्र स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. हिच स्थिती नवीन बांधकाम परवानगीबाबतसुद्धा दिसून येत आहे. मुख्याधिकारी व संबंधित लिपिकांमध्ये समन्वयकाचा अभाव असल्याने एकमेकांवर चालढकल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तारूढ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.नगर परिषदेचे उत्पन्न वाढावे, यासाठी फेरफार व नवीन बांधकामाची परवानगी प्रकरणाचा निपटारा त्वरित करणे आवश्यक असताना मात्र याकडे न.प.प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नगर परिषदेत लिपिकाकडे गेल्यास साहेबांशी बोलून सांगतो, असे सांगितले जाते. मुख्याधिकारी यांच्याकडे गेल्यावर संबंधित लिपीक फाईल आणीत नाही तर मी काय करू, असे मुख्याधिकारी सांगतात. तसेच लिपीक असेल तर मुख्याधिकारी नाही, मुख्याधिकारी असेल तर लिपिक नाही, अशी स्थिती वारंवार होत असते. नागरिक फेरफार प्रकरणाचा निपटारा होण्यास प्रयत्न करतात, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकमेकांकडे बोट दाखविण्यात व वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून फेरफारची प्रकरणे धुळखात पडली आहेत. फेरफार व्हावा, यासाठी वेळोवेळी नगर परिषदेत येरझारा मारताना नागरिक दिसतात. मात्र रिकाम्या हाताने प्रत्येक वेळी परत जावे लागत आहे. हा नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.नगर परिषदेत भाजपाप्रणीत सत्ता असून संपूर्ण स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सत्तारूढ पक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांनी संबंधित लिपीक व मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांचे काम व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे असताना त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी जावे कुठे, असा प्रश्न पडला आहे. चिरीमिरीसाठी लिपीक व मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगर परिषदेतील सावळा गोंधळ केव्हा संपणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.