शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फेरफार व नवीन परवानगीचे अनेक प्रकरणे धूळ खात

By admin | Updated: December 29, 2015 20:17 IST

नगर परिषद मूल येथील मालमत्ता विभागात फेरफार करण्यासंदर्भात अनेक प्रकरणे धूळखात पडली असून फेरफार केल्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढू शकते.

राजू गेडाम ल्ल मूलनगर परिषद मूल येथील मालमत्ता विभागात फेरफार करण्यासंदर्भात अनेक प्रकरणे धूळखात पडली असून फेरफार केल्यामुळे नगर परिषदेचे उत्पन्न वाढू शकते. मात्र स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. हिच स्थिती नवीन बांधकाम परवानगीबाबतसुद्धा दिसून येत आहे. मुख्याधिकारी व संबंधित लिपिकांमध्ये समन्वयकाचा अभाव असल्याने एकमेकांवर चालढकल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तारूढ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.नगर परिषदेचे उत्पन्न वाढावे, यासाठी फेरफार व नवीन बांधकामाची परवानगी प्रकरणाचा निपटारा त्वरित करणे आवश्यक असताना मात्र याकडे न.प.प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नगर परिषदेत लिपिकाकडे गेल्यास साहेबांशी बोलून सांगतो, असे सांगितले जाते. मुख्याधिकारी यांच्याकडे गेल्यावर संबंधित लिपीक फाईल आणीत नाही तर मी काय करू, असे मुख्याधिकारी सांगतात. तसेच लिपीक असेल तर मुख्याधिकारी नाही, मुख्याधिकारी असेल तर लिपिक नाही, अशी स्थिती वारंवार होत असते. नागरिक फेरफार प्रकरणाचा निपटारा होण्यास प्रयत्न करतात, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकमेकांकडे बोट दाखविण्यात व वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून फेरफारची प्रकरणे धुळखात पडली आहेत. फेरफार व्हावा, यासाठी वेळोवेळी नगर परिषदेत येरझारा मारताना नागरिक दिसतात. मात्र रिकाम्या हाताने प्रत्येक वेळी परत जावे लागत आहे. हा नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.नगर परिषदेत भाजपाप्रणीत सत्ता असून संपूर्ण स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सत्तारूढ पक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांनी संबंधित लिपीक व मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांचे काम व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे असताना त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी जावे कुठे, असा प्रश्न पडला आहे. चिरीमिरीसाठी लिपीक व मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगर परिषदेतील सावळा गोंधळ केव्हा संपणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.