शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

बहिणीला मुखाग्नी देताच 'त्यांनी' केले रक्तदान, गरीब महिलेचे वाचले प्राण

By साईनाथ कुचनकार | Updated: September 4, 2022 22:00 IST

दु:ख विसरून वेकोलि कर्मचाऱ्याने पार पाडली सामाजिक जबाबदारी

चंद्रपूर : मोठ्या बहिणीचे निधन झाले. तिच्यावर जड अंत:करणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याचवेळी एका गरीब महिलेला रक्ताची गरज असल्याची माहिती मिळाली. सर्व दु:ख बाजूला सारून विनोद मेश्राम या वेकोलि कर्मचाऱ्याने थेट रुग्णालय गाठले आणि रक्तदान केले. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे एका महिलेचे प्राण वाचले.

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सावली तालुक्यातील एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, रक्ताची गरज असल्याचे डाॅक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले. कुटुंबियांनी धडपड सुरू केली. यासंदर्भातील माहिती रक्तमित्र भटाळी ग्रुपचे स्वप्नील रागीट यांना कळली. त्यांनी ग्रुपमध्ये ए पाॅझिटिव्ह रक्तगट असलेल्यांची नावे काढली. यामध्ये विनोद मेश्राम यांचा रक्तगट ए पाॅझिटिव्ह असल्याचे त्यांना दिसले.

त्यानंतर मेश्राम यांना फोन करून रुग्णालयात जाऊन रक्तदान करण्याची विनंती करण्यात आली. मेश्राम यांनी वेळ वाया न घालवता थेट रुग्णालयात पोहोचून रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर विनोद मेश्राम यांच्या सख्ख्या बहिणीची निधन त्याचदिवशी झाले असून, अंत्यसंस्कार आटोपून त्यांनी रुग्णालय गाठल्याचे सर्वांना कळले. मेश्राम यांनी सामाजिक बांधिलकी जपत दु:ख विसरून केलेल्या रक्तदानामुळे एका गरीब महिलेचे प्राण वाचले. याबद्दल मेश्राम यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

रक्तमित्र भटाळी ग्रुपचंद्रपूर येथील वेकोलि कर्मचारी स्वप्नील रागीट हे रक्तमित्र भटाळी ग्रुप चालवितात. या ग्रुपच्या माध्यमातून ते गरजूंना रक्त पोहोचविण्याचे काम करत आहेत. आजपर्यंत अनेक रुग्णांना त्यांनी ग्रुपच्या माध्यमातून रक्तदानासाठी मदत केली आहे.

रुग्णाला रक्ताची गरजसावली तालुक्यातील माया गद्देवार यांना ए पाॅझिटिव्ह रक्ताची गरज होती. यासाठी त्यांची शस्त्रक्रिया अडली होती. ही गरज लक्षात घेत स्वप्नील रागीट यांनी या महिला रुग्णाला वेकोलि कर्मचाऱ्याच्या माध्यमातून रक्त मिळवून दिले.

माझ्या मोठ्या बहिणीचे निधन झाले. याच दु:खात आम्ही होतो. मात्र, सावली तालुक्यातील एका महिला रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असल्याचा फोन आला. त्यामुळे दु:ख बाजूला सारून गरजू महिलेचे प्राण वाचविण्यासाठी अंत्यसंस्कार झाल्यानंतर थेट रुग्णालयात पोहोचलो आणि रक्तदान केले. आपल्या रक्तदानामुळे एका रुग्ण महिलेला मदत झाली, याचे मोठे समाधान आहे.विनोद मेश्रामवेकोलि कर्मचारी, चंद्रपूर

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र