शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्य रोजगारयुक्त करु या

By admin | Updated: May 2, 2015 01:05 IST

राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे.

चंद्रपूर : राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे. त्यामुळे या घटना शून्यावर आणत रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करु या, असे आवाहन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपुरातील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा मुख्यसमारंभ पार पडला. यावेळी ते जनतेला दिलेल्या संदेशात बोलत होते. महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर ना. मुनगंटीवार यांनी जिल्हावासियांना संबोधित केले. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावर सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर १२२ एकर जागेवर सैनिकी शाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. दारिद्रय रेषेखालील विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वत:ची जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणारी अभिनव पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नुकतीच अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभाथ्यार्ला घरकुलासाठी जागा खरेदी करण्याकरिता ५० हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दजार्चे पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकांचा विकास तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदोडाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.दारुबंदीकडून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करावयाची आहे. यासाठी नागरिक व तरुण वर्गाच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना आदी योजनेत जिल्हयाने प्रगती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रादरम्यान जलयुक्त शिवार प्रचार रथाला पालकमंत्र्यांनी दाखविली. तत्पूर्वी विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी-कर्मचारी व खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस विभागाकडून त्यांनी मानवंदानाही यावेळी स्विकारली. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)