शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

राज्य रोजगारयुक्त करु या

By admin | Updated: May 2, 2015 01:05 IST

राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे.

चंद्रपूर : राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे. त्यामुळे या घटना शून्यावर आणत रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करु या, असे आवाहन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपुरातील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा मुख्यसमारंभ पार पडला. यावेळी ते जनतेला दिलेल्या संदेशात बोलत होते. महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर ना. मुनगंटीवार यांनी जिल्हावासियांना संबोधित केले. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावर सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर १२२ एकर जागेवर सैनिकी शाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. दारिद्रय रेषेखालील विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वत:ची जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणारी अभिनव पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नुकतीच अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभाथ्यार्ला घरकुलासाठी जागा खरेदी करण्याकरिता ५० हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दजार्चे पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकांचा विकास तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदोडाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.दारुबंदीकडून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करावयाची आहे. यासाठी नागरिक व तरुण वर्गाच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना आदी योजनेत जिल्हयाने प्रगती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रादरम्यान जलयुक्त शिवार प्रचार रथाला पालकमंत्र्यांनी दाखविली. तत्पूर्वी विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी-कर्मचारी व खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस विभागाकडून त्यांनी मानवंदानाही यावेळी स्विकारली. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)