शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

मेक इन चंद्रपूरच्या कामाला सुरुवात - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: October 31, 2015 02:02 IST

चंद्रपूर जिल्ह्याचा विकास हे आपले स्वप्न आणि उद्दिष्ट आहे. त्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असून त्याचे प्रत्यंतर येत्या पाच वर्षांत दिसणारच आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचा विकास हे आपले स्वप्न आणि उद्दिष्ट आहे. त्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असून त्याचे प्रत्यंतर येत्या पाच वर्षांत दिसणारच आहे. मेक इन चंद्रपूरच्या कामाला सुरूवात झाली आहे, असा विश्वास वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना ते म्हणाले, या जिल्ह्याच्या विकासाकडे आजवर कुणाचेही लक्ष नव्हते. या जिल्ह्याच्या विकासाचा आपणहीे एक भाग व्हावे, असे कुणालाही वाटले नव्हते. म्हणूनच बरीच मोठी साधन सामग्री असूनही आणि विकासाला वाव असूनही या जिल्ह्याकडे आजवर दुर्लक्षच झाले. मात्र आपण ज्या जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत आलो, त्यांच्यासाठी या जिल्ह्यात विकासाची गंगाजळी वाहविण्याचा ध्यास आपण घेतला आहे. त्यातूनच विविध योजना, प्रकल्पांची आखणी येथे सुरू आहे. अनेक विषय मार्गी लागले असून काही उपक्रम सुरूही झाले आहेत.विकासाची जंत्री सांगताना ते म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा शब्द आपण जनतेला दिला होता. सत्तेत येताच तो पूर्ण केला. जिल्ह्याची गरज आणि उपलब्धता लक्षात घेऊन १०० कोटी रूपयांचे बॉटनिकल गार्डन येथे मंजूर झाले आहे. या सोबतच, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, राजुरा, पोंभूर्णा, मूल या ठिकाणी वन उद्यानही उभारले जाणार आहे. चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज होती. त्याची पूर्तता आपण करू शकलो याचा आनंद आहे. वन अकादमी, सैनिकी शाळा लवकरच सुरु होत आहे. चंद्रपूरच्या विकासाची गरज लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून १०० कोटी रूपयांचा निधी प्रथमच चंद्रपूर शहराला देण्यात आपणास यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यामतून मिशन नवचेतना हा उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील २ हजार ५०० अंगणवाड्या आदर्श करण्याच्या दृष्टीने योजना आखली आहे. त्यासाठी यंत्रणा कामी लागली आहे. माजी मालगुजारी तलावासाठी भरीव निधी देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. गोसेखुर्दचे पाणी मिळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्थेचा घेतलेल्या निर्णयाचा फायदा या जिल्ह्यासाठी चांगला होणार आहे. चंद्रपुरात ७ कोटी ५० लाख रूपये खर्चून नियोजन भवन बांधले जाणार आहे. प्रियदर्शिनी सभागृहाच्या नुतनिकारणासाठी चार कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यासाठी विकास परिषदा घेवून विकासाचा आराखडा आखलेला आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन राज्यात मॉडेल पोलीस स्टेशन म्हणून करण्यासाठी निवडले आहे. बाबूपेठ उड्डाण पुलासाठी गेल्या वर्षभरापासूनच वेगाने प्रयत्न सुरू झाले असून हा प्रश्न मार्गी लागला आहे. चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा येथील स्टेडियमच्या कामाला गती आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व्हावे यासाठी पाऊले उचलली आहे. वाघांच्या संरक्षणासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ब्रँड अँबेसेडर म्हणन जबाबदारी स्विकारली आहे. त्याचाही फायदा या जिल्ह्याला होणार आहे. सिंचनातून समृद्धीसाठी जलयुक्त शिवार ही संकल्पना जिल्ह्यात राबविली जात आहे. वेकोलिसोबत करार करून राज्य सरकार आणि वेकोलि यांच्या माध्यमातून रस्ते बांधकामासाठी प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा उचलण्याचा महत्वाकांक्षी निर्णय झाला आहे. वेकोलिच्या मदतीने बाबूपेठ परिसरात एपीजे अब्दूल कलाम यांच्या नावाने एक कोटी रूपये खर्चाचे बालोद्यान विकसित होणार आहे. रोजगार वाढीसाठी चंद्रपूरचे मायक्रो प्लॅनिंग सुरु आहे. त्यातून हजारो तरूणांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचे स्वप्न आहे. बल्लारपूर-आष्टी-आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग अस्तीत्वात आणण्यात यश आले आहे. त्याचा फायदा विकासात होणार आहे. बल्लारपूर, मूल या ठिकाणी चौकांमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यातून गुन्हेगारी रोखणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे हा उद्देश आहे.भविष्यात शिक्षण, सिंचन आणि रोजगार यावर भर देणे हे उद्दीष्ट आहे. जिल्हा स्वयंपूर्ण आणि परिपूणर करण्याच्या दृष्टीने या त्रीसुत्रीवर भर देवून योजना आखल्या जाणार आहेत.