शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

महाराष्ट्राची महसुली गावे तेलंगणाच्या नकाशावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:00 PM

महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देसीमावादाचा प्रश्न कायम महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण तेलंगणा शासनाने या गावांना स्वत:च्या नकाशात समाविष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापुर, पळसगुडा, भोलापठार व लेंडीगुडा ही १४ गावे १९५५-५६ च्या पहिल्या राज्य पुर्नरचना धोरणानुसार महाराष्ट्राच्या हद्दीत वसली आहेत. कुठल्याही सोयीसुविधा नसताना येथील नागरिक शेती करून जीवन जगतात. १९६५-७० पासून या गावांना महाराष्ट्रात मतदान करण्याचा हक्क मिळाला. दरम्यान, शासनाने विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे १७ जुलै १९९७ ला सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे ही १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु या वादग्रस्त गावांकडे विकासाच्या योजना राबविण्यात सरकारला अपयश आले. याचाच फायदा घेत आधीच्या आंध्र्र प्रदेश आणि आता नवनिर्मित तेलंगणा सरकारने या १४ गावांमध्ये विविध योजना सुरू केल्या आहेत.लोकांची मने जिंकण्याचा जणू सपाटाच सुरू केल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला २१ वर्षे पूर्ण झाले. परंतु, तेलंगणा शासन त्या मराठी १५ गावांवरील ताबा सोडायला तयार नाही. आता तर महाराष्ट्राची ही गावे थेट तेलंगणाच्या नकाशातही समाविष्ट करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून तेलंगणा शासनाचा ताबा हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलावे.- रामदास रणवीर, सामाजिक कार्यकर्ता मुकादमगुडा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार