शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्राची महसुली गावे तेलंगणाच्या नकाशावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 13:01 IST

महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देसीमावादाचा प्रश्न कायम महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण तेलंगणा शासनाने या गावांना स्वत:च्या नकाशात समाविष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापुर, पळसगुडा, भोलापठार व लेंडीगुडा ही १४ गावे १९५५-५६ च्या पहिल्या राज्य पुर्नरचना धोरणानुसार महाराष्ट्राच्या हद्दीत वसली आहेत. कुठल्याही सोयीसुविधा नसताना येथील नागरिक शेती करून जीवन जगतात. १९६५-७० पासून या गावांना महाराष्ट्रात मतदान करण्याचा हक्क मिळाला. दरम्यान, शासनाने विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे १७ जुलै १९९७ ला सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे ही १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु या वादग्रस्त गावांकडे विकासाच्या योजना राबविण्यात सरकारला अपयश आले. याचाच फायदा घेत आधीच्या आंध्र्र प्रदेश आणि आता नवनिर्मित तेलंगणा सरकारने या १४ गावांमध्ये विविध योजना सुरू केल्या आहेत.लोकांची मने जिंकण्याचा जणू सपाटाच सुरू केल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला २१ वर्षे पूर्ण झाले. परंतु, तेलंगणा शासन त्या मराठी १५ गावांवरील ताबा सोडायला तयार नाही. आता तर महाराष्ट्राची ही गावे थेट तेलंगणाच्या नकाशातही समाविष्ट करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून तेलंगणा शासनाचा ताबा हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलावे.- रामदास रणवीर, सामाजिक कार्यकर्ता मुकादमगुडा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार