शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महाराष्ट्राची महसुली गावे तेलंगणाच्या नकाशावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 13:01 IST

महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देसीमावादाचा प्रश्न कायम महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण तेलंगणा शासनाने या गावांना स्वत:च्या नकाशात समाविष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाची १० ते १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात असूनही महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, या परिसरातील मराठी जनता महाराष्ट्र सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापुर, पळसगुडा, भोलापठार व लेंडीगुडा ही १४ गावे १९५५-५६ च्या पहिल्या राज्य पुर्नरचना धोरणानुसार महाराष्ट्राच्या हद्दीत वसली आहेत. कुठल्याही सोयीसुविधा नसताना येथील नागरिक शेती करून जीवन जगतात. १९६५-७० पासून या गावांना महाराष्ट्रात मतदान करण्याचा हक्क मिळाला. दरम्यान, शासनाने विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे १७ जुलै १९९७ ला सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे ही १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु या वादग्रस्त गावांकडे विकासाच्या योजना राबविण्यात सरकारला अपयश आले. याचाच फायदा घेत आधीच्या आंध्र्र प्रदेश आणि आता नवनिर्मित तेलंगणा सरकारने या १४ गावांमध्ये विविध योजना सुरू केल्या आहेत.लोकांची मने जिंकण्याचा जणू सपाटाच सुरू केल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला २१ वर्षे पूर्ण झाले. परंतु, तेलंगणा शासन त्या मराठी १५ गावांवरील ताबा सोडायला तयार नाही. आता तर महाराष्ट्राची ही गावे थेट तेलंगणाच्या नकाशातही समाविष्ट करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून तेलंगणा शासनाचा ताबा हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलावे.- रामदास रणवीर, सामाजिक कार्यकर्ता मुकादमगुडा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार