शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: प्रेरणादायी! मुलगा आमदार झाला तरीही आई बांबूच्या टोपल्याच विकत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 10:28 IST

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा किशोर जोरगेवार हे अपक्ष म्हणून 75 हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत.

चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा किशोर जोरगेवार हे अपक्ष म्हणून 75 हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. आपल्या लेकराचे हे यश डोळ्यात साठविण्यासाठी जोरगेवार यांची आई त्यावेळी गर्दीतून वाट काढत त्यांच्या जवळ आली. यावेळी किशोर जोरगेवार यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाहीत. या विजयानंतर जोरगेवार आणि त्यांच्या आईनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.नवनिर्वाचित अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या आई म्हणतात, मी खूप कष्ट केलेत, बाजारात बसले, आम्ही खूप गरीब परिस्थितीतून दिवस काढले. माझी मुलं चांगली निघावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना केल्या आणि मुलंसुद्धा चांगलीच निघाली, त्याबद्दल मी देवाची आभारी आहे. मला दोन मुलं आणि तीन मुली आहेत, माझं सगळं कुटुंब चांगलं आहे. मुलगा एकदा तरी आमदार व्हावा आणि माझ्यासमोर यावा, अशी माझी खूप इच्छा होती. माझा मुलगा आमदार झाल्यानं मला आता बरं वाटतंय. विधानसभा निवडणुकीदरम्यान मी आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल होती, त्यावेळीही अनेकांनी मला तुझा मुलगा निवडून येईल, असं सांगितलं. पण मी म्हणायचे कसा काय येणार तो निवडून, आजही मी बाजारात टोपल्या विकते, मुलगा आमदार झाल्याचा मला अजिबात अहंकार नाही. हलाखीच्या परिस्थितीतून दिवस काढून आम्ही वर आलो. परमेश्वरानं आम्हाला चांगलं द्यावं, आम्ही जसं आहोत तसंच राहू.बांबूच्या टोपल्या विकण्याचा माझा कामधंदा आहे, त्यामुळे मी टोपल्या विकतच राहणार आहे. कामधंद्यात कसलीही लाज नाही. टोपल्या विकणारी आमदाराची आई असं म्हटलं तरी मला काय फरक पडणार नाही. मला पैशाची गोडी नाही, मला कष्ट करण्याची गोडी आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. दलित समाजातील असलेले किशोर जोरगेवार हे हलाखीच्या परिस्थितीशी लढा देत आमदार झाले. किशोर जोरगेवार यांची आई आजसुद्धा चंद्रपूर शहरातील गांधी चौकात टोपल्या विकण्याचा व्यवसाय करते. अपक्ष आमदार जोरगेवार म्हणतात, मेहनत करायची आणि इमानदारी करायची हे आईनं शिकवलं. गरिबीला लाजू नका आणि श्रीमंतींनं माजू नका, सगळ्यांचा चांगलं करा, असं नेहमीच आई शिकवत आली आहे. किशोर जोरगेवार यांनी 75 हजार मतांनी विजय प्राप्त केला. सुरुवातीला किशोर जोरगेवार भाजपात होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकाची 51 हजार मते त्यांना मिळाली होती. आताच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, काँग्रेसनेही त्यांना नाकारले. त्यामुळे अपक्ष म्हणून ते रिंगणात होते. तसेच ते अपक्ष म्हणूनच निवडून आले आहेत. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019