शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.

ठळक मुद्देशेतकरी मेटाकुटीला; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकीकडे निसर्गाच्या संकटाचा सामना करताना दमछाक होत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.शेतकरी कापणी करत असताना डुकरांकडून नासाडी होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. वन विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. काही शिवारात पंचनाम्याची कामे सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार होईल. त्यानंतर शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळविण्यासाठी बराच कालवधी लागण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांमध्ये दहशतजंगल परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच मोठ्या प्रमाणात संचार आहे. वन्यप्राण्यांनी शेतकरी तसेच रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांवर अनेकदा प्राणघातक हल्ले केले. अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अद्याप शासनाने प्रभावी उपाययोजना केली नाही. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यातील भातशेती प्रामुख्याने जंगल भागाला लागूनच आहे. त्यामुळे शेतकºयांना जीव मुठीत घेऊनच शेतीची कामे करावी लागत आहेत.सरपंचांशी हवा समन्वयरबी हंगामातील हरभरा पिकाचे दरवर्षीच नुकसान होते. गावस्तरावर जनजागृती करून वनविभागाने मोहीम राबविण्याची गरज आहे. काही ठिकाणी वनरक्षकांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. परंतु सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी वनरक्षक व अन्य वन कर्मचाऱ्यांचा समन्वय वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी