शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिंचनाअभावी पिके लागली करपायला

By admin | Updated: November 2, 2016 00:58 IST

सिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे.

कॅनलची दुरुस्ती केलीच नाही : धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशातप्रकाश काळे गोवरीसिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे निसर्गाच्या पाण्यावर शेतकरी शेती पिकवू शकत नाही. जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प असतानाही त्याचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात गेल्याने सिंचनाअभाावी शेती सुकायला लागली आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून कॅनलची दुरुस्ती करण्यात न आल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.जिल्ह्यात अमलनाला सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहेत, असे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदार ठरणारे आहे. परंतु सिंचन प्रकल्पाचे पाणी परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जात आहे. राजुरा- कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करणारा आहे. या प्रकल्पांतर्गत पाचगाव, भूरकुंडा (बु.), उपरवाही, मंगी, भूरकुंडा (खु.), पांढरपवनी गावे येतात. येथील शेतकऱ्यांनी अमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली. मात्र कॅनल दुरुस्तीचे काम करायचे असून पाणी सोडण्यास उशीर होईल, असे सांगण्यात आले. सध्या शेतपिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. जमिनीला भेगा पडल्याने शेतातील पीक करपायला लागले आहे. दुबार पेरणीने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीच्या रब्बी हंगामासाठी सुरुवात झाली आहे. परंतु रब्बी हंगामासाठी व पिकांना जगविण्यासाठी पाणी गरजेचे आहे. शेताजवळ कॅनल आहे. परंतु पाणी केव्हा येईल, या प्रतिक्षेत शेतकरी आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी बाभळींनी अतिक्रमणही केले जात आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतरही शेतापर्यंत पाणी पोहोचणार नाही. कॅनलची दुरुस्ती यापूर्वीच करणे गरजेचे होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.शेतमालाला पाण्याची आवश्यकता आहे. त्यावेळेस शेतीला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र पिकांना पाण्याची आवश्यकता असतानाही अजूनपर्यंत शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक कसे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतपिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हाती आलेले पीक सुकून जाईल. मग सिंचन प्रकल्प असूनही त्यांचा काय फायदा, असा प्रश्न शेतकरी विचारु लागले आहते. सिंचन प्रकल्पाने शेतीला तातडीने पाणी सुरू करावे, अशी मागणी पाचगाव येथील उपसरपंच गोपाल जांभुळकर, तिरुपती इंदूरवार, सुधाकर गेडेकर, दशरथ भोयर, दयाराम डोंगे, किसन पिंपळकर, रुपेश गेडेकर, दिनकर जीवतोडे, बाबुराव विरंदरे आदींनी केली आहे.सिंचन प्रकल्प शेतीसाठी वरदान कसा ?शेती आणि पाणी यांचे एक समीकरण जुळले आहे. निसर्गाची शेतीला साथ उरली नाही. पाण्याशिवाय शेतकरी उत्पादन घेऊ शकत नाही, हे वास्तव आज कुणीही नाकारु शकत नाही. जिल्ह्यात अंमलनाला, पकड्डीगुड्डम सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहे. परंतु यातील बहुतांश पाणी खासगी सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. अजूनपर्यंत कॅलनची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पाचे पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.शेतपिकांना सध्या पाण्याची निंतात गरज आहे. अमलनाला सिंचन प्रकल्पातून अजूनपर्यंत शेतीला पाणी सोडण्यात आले नाही. आम्ही १५-२० शेतकऱ्यांनी अंमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु अजूनही कॅनलची दुरुस्तीच झाली नसल्याचे सांगण्यात आले असून पाण्याअभाावी शेतीपिके करपायला लागली आहेत.- सुधाकर गेडेकर, शेतकरी, पाचगाव