शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

सिंचनाअभावी पिके लागली करपायला

By admin | Updated: November 2, 2016 00:58 IST

सिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे.

कॅनलची दुरुस्ती केलीच नाही : धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशातप्रकाश काळे गोवरीसिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे निसर्गाच्या पाण्यावर शेतकरी शेती पिकवू शकत नाही. जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प असतानाही त्याचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात गेल्याने सिंचनाअभाावी शेती सुकायला लागली आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून कॅनलची दुरुस्ती करण्यात न आल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.जिल्ह्यात अमलनाला सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहेत, असे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदार ठरणारे आहे. परंतु सिंचन प्रकल्पाचे पाणी परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जात आहे. राजुरा- कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करणारा आहे. या प्रकल्पांतर्गत पाचगाव, भूरकुंडा (बु.), उपरवाही, मंगी, भूरकुंडा (खु.), पांढरपवनी गावे येतात. येथील शेतकऱ्यांनी अमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली. मात्र कॅनल दुरुस्तीचे काम करायचे असून पाणी सोडण्यास उशीर होईल, असे सांगण्यात आले. सध्या शेतपिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. जमिनीला भेगा पडल्याने शेतातील पीक करपायला लागले आहे. दुबार पेरणीने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीच्या रब्बी हंगामासाठी सुरुवात झाली आहे. परंतु रब्बी हंगामासाठी व पिकांना जगविण्यासाठी पाणी गरजेचे आहे. शेताजवळ कॅनल आहे. परंतु पाणी केव्हा येईल, या प्रतिक्षेत शेतकरी आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी बाभळींनी अतिक्रमणही केले जात आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतरही शेतापर्यंत पाणी पोहोचणार नाही. कॅनलची दुरुस्ती यापूर्वीच करणे गरजेचे होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.शेतमालाला पाण्याची आवश्यकता आहे. त्यावेळेस शेतीला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र पिकांना पाण्याची आवश्यकता असतानाही अजूनपर्यंत शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक कसे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतपिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हाती आलेले पीक सुकून जाईल. मग सिंचन प्रकल्प असूनही त्यांचा काय फायदा, असा प्रश्न शेतकरी विचारु लागले आहते. सिंचन प्रकल्पाने शेतीला तातडीने पाणी सुरू करावे, अशी मागणी पाचगाव येथील उपसरपंच गोपाल जांभुळकर, तिरुपती इंदूरवार, सुधाकर गेडेकर, दशरथ भोयर, दयाराम डोंगे, किसन पिंपळकर, रुपेश गेडेकर, दिनकर जीवतोडे, बाबुराव विरंदरे आदींनी केली आहे.सिंचन प्रकल्प शेतीसाठी वरदान कसा ?शेती आणि पाणी यांचे एक समीकरण जुळले आहे. निसर्गाची शेतीला साथ उरली नाही. पाण्याशिवाय शेतकरी उत्पादन घेऊ शकत नाही, हे वास्तव आज कुणीही नाकारु शकत नाही. जिल्ह्यात अंमलनाला, पकड्डीगुड्डम सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहे. परंतु यातील बहुतांश पाणी खासगी सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. अजूनपर्यंत कॅलनची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पाचे पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.शेतपिकांना सध्या पाण्याची निंतात गरज आहे. अमलनाला सिंचन प्रकल्पातून अजूनपर्यंत शेतीला पाणी सोडण्यात आले नाही. आम्ही १५-२० शेतकऱ्यांनी अंमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु अजूनही कॅनलची दुरुस्तीच झाली नसल्याचे सांगण्यात आले असून पाण्याअभाावी शेतीपिके करपायला लागली आहेत.- सुधाकर गेडेकर, शेतकरी, पाचगाव