शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाअभावी पिके लागली करपायला

By admin | Updated: November 2, 2016 00:58 IST

सिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे.

कॅनलची दुरुस्ती केलीच नाही : धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशातप्रकाश काळे गोवरीसिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे निसर्गाच्या पाण्यावर शेतकरी शेती पिकवू शकत नाही. जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प असतानाही त्याचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात गेल्याने सिंचनाअभाावी शेती सुकायला लागली आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून कॅनलची दुरुस्ती करण्यात न आल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.जिल्ह्यात अमलनाला सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहेत, असे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदार ठरणारे आहे. परंतु सिंचन प्रकल्पाचे पाणी परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जात आहे. राजुरा- कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करणारा आहे. या प्रकल्पांतर्गत पाचगाव, भूरकुंडा (बु.), उपरवाही, मंगी, भूरकुंडा (खु.), पांढरपवनी गावे येतात. येथील शेतकऱ्यांनी अमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली. मात्र कॅनल दुरुस्तीचे काम करायचे असून पाणी सोडण्यास उशीर होईल, असे सांगण्यात आले. सध्या शेतपिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. जमिनीला भेगा पडल्याने शेतातील पीक करपायला लागले आहे. दुबार पेरणीने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीच्या रब्बी हंगामासाठी सुरुवात झाली आहे. परंतु रब्बी हंगामासाठी व पिकांना जगविण्यासाठी पाणी गरजेचे आहे. शेताजवळ कॅनल आहे. परंतु पाणी केव्हा येईल, या प्रतिक्षेत शेतकरी आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी बाभळींनी अतिक्रमणही केले जात आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतरही शेतापर्यंत पाणी पोहोचणार नाही. कॅनलची दुरुस्ती यापूर्वीच करणे गरजेचे होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.शेतमालाला पाण्याची आवश्यकता आहे. त्यावेळेस शेतीला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र पिकांना पाण्याची आवश्यकता असतानाही अजूनपर्यंत शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक कसे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतपिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हाती आलेले पीक सुकून जाईल. मग सिंचन प्रकल्प असूनही त्यांचा काय फायदा, असा प्रश्न शेतकरी विचारु लागले आहते. सिंचन प्रकल्पाने शेतीला तातडीने पाणी सुरू करावे, अशी मागणी पाचगाव येथील उपसरपंच गोपाल जांभुळकर, तिरुपती इंदूरवार, सुधाकर गेडेकर, दशरथ भोयर, दयाराम डोंगे, किसन पिंपळकर, रुपेश गेडेकर, दिनकर जीवतोडे, बाबुराव विरंदरे आदींनी केली आहे.सिंचन प्रकल्प शेतीसाठी वरदान कसा ?शेती आणि पाणी यांचे एक समीकरण जुळले आहे. निसर्गाची शेतीला साथ उरली नाही. पाण्याशिवाय शेतकरी उत्पादन घेऊ शकत नाही, हे वास्तव आज कुणीही नाकारु शकत नाही. जिल्ह्यात अंमलनाला, पकड्डीगुड्डम सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहे. परंतु यातील बहुतांश पाणी खासगी सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. अजूनपर्यंत कॅलनची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पाचे पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.शेतपिकांना सध्या पाण्याची निंतात गरज आहे. अमलनाला सिंचन प्रकल्पातून अजूनपर्यंत शेतीला पाणी सोडण्यात आले नाही. आम्ही १५-२० शेतकऱ्यांनी अंमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु अजूनही कॅनलची दुरुस्तीच झाली नसल्याचे सांगण्यात आले असून पाण्याअभाावी शेतीपिके करपायला लागली आहेत.- सुधाकर गेडेकर, शेतकरी, पाचगाव