शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Lok Sabha Election 2019; तीनही प्रमुख उमेदवारांच्या गोटात विजयाचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:54 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगले होते.

ठळक मुद्देमतदानासोबतच रंगू लागल्या निकालाच्या चर्चा : मात्र कुणालाही ठामपणे सांगता येईना !

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगले होते. कुठे भाजप, कुठे काँग्रेसच जिंकेल असा सूर होता. तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीही गठ्ठा मते घेण्याची चर्चा होती. मात्र कुणीही एकावर ठाम दिसत नव्हते. कोणताही पक्ष जिंकला तरी मताधिक्य मात्र कमी असल्याचेही बोलले जात होते. यावरून ही निवडणूक काट्याची झाल्याचा अंदाज येत होता.लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच मतांची गणिते मांडणे सुरू होते. काँग्रेसने तगडा उमेदवार मैदानात उतरविल्यास भाजपसमोर कडवे आव्हान उभे करता येणे शक्य आहे, असा सूर होता. तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून दररोज नवे नाव समोर येत होते.यामुळे काँग्रेसश्रेष्ठी उमेदवाराबाबत ठाम नसल्यामुळे मतदार संभ्रमात पडले होते. चर्चेत नसताना अचानक विशाल मुत्तेमवार यांचे नाव पुढे आले. या नावारून जिल्ह्यातील गटबाजी उफाळून आली. आशिष देशमुख, विनायक बांगडे यांची नावे चर्चेत होतीच. मुत्तेमवार यांचे नाव मागे पडून अचानक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विनायक बांगडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. बांगडे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र ते अल्पकाळाचे ठरले. विशाल मु्त्तेमवारांसारखाच बांगडे यांच्या नावालाही कडवा विरोध झाला. अखेर सुरूवातीपासून काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून असलेले सुरेश धानोरकर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब करीत बांगडे यांचे नाव यादीतून वगळले. यामुळे बांगडे यांच्याशी जुळलेला एक मोठा गट नाराजीचा सूर काढत राहिला. अखेरच्या क्षणापर्यंत ही नाराजी कायम होती. प्रचारातही एक गट कायम अंतर ठेवून होता.दुसरीकडे भाजप पूर्ण ताकदीनिशी प्राचारात उतरली होती. दुसरीकडे राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे हंसराज अहीर यांच्या बाजूने खिंड लढवत होते. यासोबतच भाजपने काही स्टार नेत्यांच्याही मतदार संघात सभा घेतल्या. काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय दुसऱ्या मोठ्या नेत्याची सभा या मतदार संघात घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्यासाठी जंगजंग पछाडत होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी सुरूवातीला धिम्म्या गतीने प्रचार सुरू केला खरा, परंतु प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून आले. त्यांचा कॅडर तन-मन-धनाने प्रचारात गुंतला होता. बारा दिवसातील प्रचाराच्या काळात हे तीनच उमेदवार या ना त्या कारणाने चर्चेत होते.अन्य उमेदवार प्रचारात आणि जनतेच्या चर्चेतही दिसले नाही. ही निवडणूक या तीनच उमेदवारांसभोवताल फिरत होती. ग्रामीण व शहरी भागाचा अंदाज घेतला असता ग्रामीण भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असल्याचे बोलले जात होते. शहरी भागातही हेच चित्र होते. वंचित बहुजन आघाडीही चमत्कारीत मते घेतील, असा सूर काही ठिकाणी ऐकायला मिळाला.वंचित बहुजन आघाडीने जितकी जास्त मते घेतली त्याचा थेट फायदा भाजपला होईल, असेही चर्चेतून पुढे येत होते. तीनही उमेदवारांच्या गोटात डोकावून बघितले असता प्रत्येकच पक्ष विजयाचा दावा करीत आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने मतांची गोळा-बेरीज करून विजयाचे गणित पटवून देत आहेत.मात्र एकूणच दिवसभराच्या माहोलवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मतांची कडवी झुंज होणार असल्याचे चित्र आहे. पैकी एकाचा कमी फरकाने का होईना विजय होईल, असे चित्र आहे. निकालासाठी आणखी बराच काळ वाट पहावी लागणार असल्यामुळे ही गणिते दिवसागणिक बदलणार हे मात्र नक्की. कोणाचे गणित बरोबर आणि कोणाचे चुकले हे निकालाअंती कळणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019