शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच महाराष्ट्राची मोठी अधोगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:20 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. देशात ५० हजार तर महाराष्ट्रात १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महच्या झाल्या. महाराष्ट्राची एवढी अधोगती यापूर्वी कधीही झाली नाही, असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण भाजपवर घाणाघात काँग्रेसच्या प्रचार सभेला उसळला जनसमुदाय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजपच्या पाच वर्षांच्या काळात बेरोजगारी वाढली. १५ लाखांचे आश्वासनही पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. देशात ५० हजार तर महाराष्ट्रात १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महच्या झाल्या. महाराष्ट्राची एवढी अधोगती यापूर्वी कधीही झाली नाही, असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत केला. तीन राज्यात भाजपला जनतेनी पायउतार केले. आता वेळ महाराष्ट्राची आहे. राहुलजींना पंतप्रधान पहायचे आहे. काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा विजयी करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ येथील चांदा क्लब ग्राऊंडवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा दुपारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, उमेदवार सुरेश धानोरकर, गडचिरोली मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, डॉ. रजनी हजारे व अन्य काँग्रेस-राकाँ पदाधिकारी उपस्थित होते. या सभेसाठी तळपत्या उन्हात चंद्रपूर व गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या उपस्थितीने सभास्थळ खचाखच भरले होते.दुपारी ३.३० वाजता राहुल गांधी यांचे सभास्थळी आगमण झाले. यावेळी त्यांनी हात उंचावून जनतेला अभिवादन करताच उपस्थितांनी राहुल गांधी ‘आगे बढो’च्या घोषणा दिल्या. चव्हाण पुढे म्हणाले, भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले आहे. त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढोओचा नारा दिला. मात्र ‘भाजपवालो से बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी केली.राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतमालाचे भाव कमी झाले. हमीभाव मिळत नाही. शेतकरी अडचणीत आले आहेत. बेरोजगारांचा रोजगार हिरावला गेला. देशातील कायदा व सुवव्यवस्था अडचणीत आली आहे. देश अधोगतीकडे जात आहे. ज्यांच्या हातात देशाची सूत्रे दिली तो चौकीदार म्हणताच अशोक चव्हणांचे वाक्य जनेतेने ‘चोर निघाला’ म्हणत पूर्ण केले. त्या चौकीदाराने देशाची संपत्ती लुटून नेल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.चहावाल्याने देश तर दूधवाल्याने चंद्रपूर जिल्हा बरबाद केला - वडेट्टीवारचहावाल्याने देश बरबाद केला आणि दूधवाल्याने चंद्रपूर जिल्हा बरबाद केला, हा दूधवाला १५ वर्षे खासदार म्हणून निष्क्रिय ठरला, अशी टीका काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. खासदाराने कोणतेही काम केले नाही. आता तो मंत्री आहे. नवीन उद्योग जिल्ह्यात आले नाही. बेरोजगारांचा एकही प्रश्न सुटला नाही. रेल्वेचे दोन थांबे दिले. देशाला वाचवायचे असेल, लोकशाही टिकवायची असेल आणि हुकुमशाही संपवायची असेल, तर काँग्रेसशिवाय गत्यंतर नाही, असा हल्लाबोलही आ. वडेट्टीवार यांनी केला. दारूवाला की दूधवाला पाहिजे, असे म्हणतात. बाळू धानोरकरांकडे २० वर्षांपासून परवाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. मग दारूबंदी झाली का, असा सवाल करीत आता ५० रुपयांची दारू २०० रुपयांना मिळते, असाही आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

राहुल गांधी दिल्या गुडी पाडव्याच्या शुभेच्छाकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करताच मराठी सण गुडी पाडव्याच्या उपस्थित जनसमुदायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019