शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मंदिरांची पवित्रता घालवताहेत दारू दुकाने, राजकीय दबावात मनमानी सुरू : नरेश पुगलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 10:57 IST

याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहोत. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर माेठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देजिल्हा, पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग कारणीभूत

चंद्रपूर : जिल्ह्यात राजकीय दबावात दारूचा तमाशा सुरू आहे. ही दारूची दुकाने आता मंदिरांची पवित्रता घालवत आहे. दारू दुकाने देण्यासाठी असलेले निकष पाळले जात नाही. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग कारणीभूत आहे, असा गंभीर आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

शहराचे वातावरण दूषित करण्यापेक्षा सर्व दारूची दुकाने शहराबाहेर हलवावी. राज्य शासनाने याबाबत धोरण ठरविले पाहिजे. चंद्रपूर शहरात नव्याने दारूची दुकाने सुरू झालेली आहे. पुन्हा काही दुकाने प्रस्तावित आहे. ही दारू दुकाने थाटण्यासाठी दिली जाणारी अनुमती यामध्ये निकष बाजूला ठेवले जात आहे. यामुळे शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. हा प्रकार राजकीय दबावात होत आहे, असा आरोपही पुगलिया यांनी केला. याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहोत. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर माेठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला.

दारूबंदीला विरोध नव्हता

यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होती. या दारूबंदीचा आमचा विरोध नव्हता. आम्ही कधीही दारू सुरू करण्याची मागणी केली आहे. आता दारू सुरू झाली. आता मंदिरांच्या परिसरात, शहराच्या मध्यभागी, महिलांचे ये-जा मोठ्या प्रमाणावर असलेल्या ठिकाणी दारू दुकानांना परवानगी दिली जात आहे. ही बाब गंभीर असल्याचेही नरेश पुगलिया म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणliquor banदारूबंदीNaresh Pugliaनरेश पुगलियाchandrapur-acचंद्रपूर