शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

३० वर्षानंतर प्रकाशाने उजळला झोपडपट्टी परिसर

By admin | Updated: March 30, 2017 00:47 IST

आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते.

गुढी पाडव्याचा मुहुर्त : आतापर्यंत अंधाराचेच होते अधिराज्यगोंडपिपरी : आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते. ३० वर्षाच्या काळात या आदिवासींना अनेक नेते आश्वासन देवून गेलेत. मात्र या काळोख्या अंधारात जगणाऱ्या आदिवासींची परिस्थिती जैसे थेच होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगरपंचायतीचे उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी सदर मागणी विद्युत वितरण कंपनीकडे रेटून धरली. त्यामुळे गौर यांच्या सहकार्यातून प्रभाग क्र. १३ मधील आदिवासींच्या झोपेड्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लख्ख प्रकाश मिळाला. यामुळे झोपडपट्टीवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.गोंडपिपरी शहरातील प्रभाग क्र. १३ मागील ३० ते ३५ वर्षांपासून विकासाच्या दृष्टीकोनातून पिछाडीवर होता. अशातच काट्या- गोट्यांनी बरबरटलेल्या या प्रभागात आदिवासी जमातीचे, टिनटप्परचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या कुटुंबासोबत झोपडपट्या बांधून येथे राहत आहेत. या झोपड्यातून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मागील तीस वर्ष झोपडपट्टीवासीयांनी काढलेत. या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे मतदार यादीत नावेही आलीत व ते गोंडपिपरीचे रहिवाशीही झालेत. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येईना? निवडणूक आली तरच प्रभाग क्रमांक १३ उमेदवारांना दिसत होता. मतदान मिळविण्यासाठी अनेक उमेदवार समस्या सोडविण्याचे आश्वासन देत होते. परंतु आज ३० वर्षाच्या कार्यकाळात आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. या आदिवासी बांधवांच्या जीवन संघर्षाची माहिती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चेतनसिंह गौर यांना मिळाली. त्यांनी पहिल्यांदा या प्रभागात विद्युत पुरवठा करण्याचा निश्चय केला आणि सदर समस्येच्या सोडवणुकीसाठी विद्युत वितरण कंपनीकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. चेतनसिंह गौर यांच्या पाठपुराव्याची विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली व आदिवासी सुधारणा योजने अंतर्गत अहेरी राज्य महामार्गावरुन प्राची गॅस एजन्सी समोरच्या रोडवरुन सात पोल टाकलेत आणि गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी झोपडपट्टीवासीयांच्या झोपड्यात प्रकाश आला. आदिवासी जमातीचे हे कुटुंब व्यावसायाने टिनटप्पर विकणारे. त्यांची विजेची समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. अनेकदा या त्या नेत्यांकडे जावूनही कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मात्र त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी चेतनसिंह गौर पुढे सरसावल्याने त्यांच्या झोपड्या प्रकाशाने उजळल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)मागील तीस वर्षापासून आम्ही दिवाबत्तीत राहत होतो. सभोवताल झाडेझुडपे आहे. जीव मुठीत घेवून रहावे लागत होते. साप, विंचू यासारख्या अनेक विषारी प्राण्यांचा सामना करावा लागला. आता मात्र विजेची सोय उपलब्ध झाल्याने आमच्या आदिवासी बांधवामध्ये आनंद पसरला आहे.- शंकर येलय्या परचाके