शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

३० वर्षानंतर प्रकाशाने उजळला झोपडपट्टी परिसर

By admin | Updated: March 30, 2017 00:47 IST

आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते.

गुढी पाडव्याचा मुहुर्त : आतापर्यंत अंधाराचेच होते अधिराज्यगोंडपिपरी : आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते. ३० वर्षाच्या काळात या आदिवासींना अनेक नेते आश्वासन देवून गेलेत. मात्र या काळोख्या अंधारात जगणाऱ्या आदिवासींची परिस्थिती जैसे थेच होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगरपंचायतीचे उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी सदर मागणी विद्युत वितरण कंपनीकडे रेटून धरली. त्यामुळे गौर यांच्या सहकार्यातून प्रभाग क्र. १३ मधील आदिवासींच्या झोपेड्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लख्ख प्रकाश मिळाला. यामुळे झोपडपट्टीवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.गोंडपिपरी शहरातील प्रभाग क्र. १३ मागील ३० ते ३५ वर्षांपासून विकासाच्या दृष्टीकोनातून पिछाडीवर होता. अशातच काट्या- गोट्यांनी बरबरटलेल्या या प्रभागात आदिवासी जमातीचे, टिनटप्परचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या कुटुंबासोबत झोपडपट्या बांधून येथे राहत आहेत. या झोपड्यातून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मागील तीस वर्ष झोपडपट्टीवासीयांनी काढलेत. या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे मतदार यादीत नावेही आलीत व ते गोंडपिपरीचे रहिवाशीही झालेत. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येईना? निवडणूक आली तरच प्रभाग क्रमांक १३ उमेदवारांना दिसत होता. मतदान मिळविण्यासाठी अनेक उमेदवार समस्या सोडविण्याचे आश्वासन देत होते. परंतु आज ३० वर्षाच्या कार्यकाळात आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. या आदिवासी बांधवांच्या जीवन संघर्षाची माहिती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चेतनसिंह गौर यांना मिळाली. त्यांनी पहिल्यांदा या प्रभागात विद्युत पुरवठा करण्याचा निश्चय केला आणि सदर समस्येच्या सोडवणुकीसाठी विद्युत वितरण कंपनीकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. चेतनसिंह गौर यांच्या पाठपुराव्याची विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली व आदिवासी सुधारणा योजने अंतर्गत अहेरी राज्य महामार्गावरुन प्राची गॅस एजन्सी समोरच्या रोडवरुन सात पोल टाकलेत आणि गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी झोपडपट्टीवासीयांच्या झोपड्यात प्रकाश आला. आदिवासी जमातीचे हे कुटुंब व्यावसायाने टिनटप्पर विकणारे. त्यांची विजेची समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. अनेकदा या त्या नेत्यांकडे जावूनही कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मात्र त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी चेतनसिंह गौर पुढे सरसावल्याने त्यांच्या झोपड्या प्रकाशाने उजळल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)मागील तीस वर्षापासून आम्ही दिवाबत्तीत राहत होतो. सभोवताल झाडेझुडपे आहे. जीव मुठीत घेवून रहावे लागत होते. साप, विंचू यासारख्या अनेक विषारी प्राण्यांचा सामना करावा लागला. आता मात्र विजेची सोय उपलब्ध झाल्याने आमच्या आदिवासी बांधवामध्ये आनंद पसरला आहे.- शंकर येलय्या परचाके