शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षानंतर प्रकाशाने उजळला झोपडपट्टी परिसर

By admin | Updated: March 30, 2017 00:47 IST

आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते.

गुढी पाडव्याचा मुहुर्त : आतापर्यंत अंधाराचेच होते अधिराज्यगोंडपिपरी : आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते. ३० वर्षाच्या काळात या आदिवासींना अनेक नेते आश्वासन देवून गेलेत. मात्र या काळोख्या अंधारात जगणाऱ्या आदिवासींची परिस्थिती जैसे थेच होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगरपंचायतीचे उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी सदर मागणी विद्युत वितरण कंपनीकडे रेटून धरली. त्यामुळे गौर यांच्या सहकार्यातून प्रभाग क्र. १३ मधील आदिवासींच्या झोपेड्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लख्ख प्रकाश मिळाला. यामुळे झोपडपट्टीवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.गोंडपिपरी शहरातील प्रभाग क्र. १३ मागील ३० ते ३५ वर्षांपासून विकासाच्या दृष्टीकोनातून पिछाडीवर होता. अशातच काट्या- गोट्यांनी बरबरटलेल्या या प्रभागात आदिवासी जमातीचे, टिनटप्परचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या कुटुंबासोबत झोपडपट्या बांधून येथे राहत आहेत. या झोपड्यातून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मागील तीस वर्ष झोपडपट्टीवासीयांनी काढलेत. या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे मतदार यादीत नावेही आलीत व ते गोंडपिपरीचे रहिवाशीही झालेत. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येईना? निवडणूक आली तरच प्रभाग क्रमांक १३ उमेदवारांना दिसत होता. मतदान मिळविण्यासाठी अनेक उमेदवार समस्या सोडविण्याचे आश्वासन देत होते. परंतु आज ३० वर्षाच्या कार्यकाळात आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. या आदिवासी बांधवांच्या जीवन संघर्षाची माहिती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चेतनसिंह गौर यांना मिळाली. त्यांनी पहिल्यांदा या प्रभागात विद्युत पुरवठा करण्याचा निश्चय केला आणि सदर समस्येच्या सोडवणुकीसाठी विद्युत वितरण कंपनीकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. चेतनसिंह गौर यांच्या पाठपुराव्याची विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली व आदिवासी सुधारणा योजने अंतर्गत अहेरी राज्य महामार्गावरुन प्राची गॅस एजन्सी समोरच्या रोडवरुन सात पोल टाकलेत आणि गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी झोपडपट्टीवासीयांच्या झोपड्यात प्रकाश आला. आदिवासी जमातीचे हे कुटुंब व्यावसायाने टिनटप्पर विकणारे. त्यांची विजेची समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. अनेकदा या त्या नेत्यांकडे जावूनही कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मात्र त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी चेतनसिंह गौर पुढे सरसावल्याने त्यांच्या झोपड्या प्रकाशाने उजळल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)मागील तीस वर्षापासून आम्ही दिवाबत्तीत राहत होतो. सभोवताल झाडेझुडपे आहे. जीव मुठीत घेवून रहावे लागत होते. साप, विंचू यासारख्या अनेक विषारी प्राण्यांचा सामना करावा लागला. आता मात्र विजेची सोय उपलब्ध झाल्याने आमच्या आदिवासी बांधवामध्ये आनंद पसरला आहे.- शंकर येलय्या परचाके