शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
3
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
4
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
5
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
6
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
7
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
8
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
9
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
10
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
11
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
12
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
13
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
14
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
20
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

कामगारांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 12:07 AM

वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

ठळक मुद्देवेकोलि कामगार वसाहतीतील घरे मोडकडीस : भिंतीला पडल्या भेगा

गजानन साखरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे वेकोलि कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात आला आहे.याशिवाय या वसाहतीतील नाल्यांची दुरूस्ती व साफसफाई नियमित होत नसल्याने कामगार कुटुंबीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वेळोवेळी क्वार्टर व नाली दुरूस्ती आणि साफसफाई करण्याची मागणी कामगारांकडून होत असली तरी व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.वेकोलिच्या निलजई कोळसा खाण क्षेत्रातील सुंदरनगर कामगार वसाहत आहे. तेथील क्वार्टरच्या भिंती कोसळत आहे. अनेक क्वार्टरच्या भिंतींना ठिक ठिकाणी तडे गेलेले आहेत. क्वार्टरच्या भिंती केव्हा कोसळेल, याचा नेम नाही. दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहे. अशाही अवस्थेत कामगार आपल्या कुटुंबासह याच घरात राहत आहे. दिवसा किंवा रात्री झोपताना केव्हा दुर्घटना घडेल, हे सांगता येत नाही.याशिवाय नाल्यांची दुरूस्ती होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कामगारांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे.यापूर्वी या कामगार वसाहतमधील क्वार्टरची पडझड झाली. मात्र सुदैवाने कामगार व त्याचे कुटुंबीय बचावले. क्वार्टरची दुरूस्ती व्हावी, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी कामगारांकडून वेळोवेळी होत आहे. या ठिकाणी कार्यरत कामगार संघटनांचे पदाधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगाराकडून होत आहे.स्वखर्चाने दुरुस्तीघराच्या भिंती केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. त्यामुळे कामगार व त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष देत नसल्याने काही कामगारांना नाईलाजाने स्वत: आपल्या खर्चाने क्वार्टर ची दुरूस्ती करावी लागत आहे. सध्या सुंदरनगर परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने कामगारांना कर्तव्यावर ये-जा करतानाही जीव धोक्यात घालावा लागत आहे. एकूणच आता कामगारांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे वेकोलिने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.