शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:00 IST

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलीे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा, तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे.

ठळक मुद्देआमिर खान : जलशक्ती कार्यशाळेत तीन समाजसेवी व्यक्तींनी दिला पाणी व्यवस्थापनाचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलीे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा, तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील जवळपास साडेचार हजार गावांमध्ये जलदूतांच्या सहाय्याने या संस्थेची कार्ये केली जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाने पाणी फाऊंडेशनच्या अभियानात सहभागी व्हावे, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आता एकत्रित प्रयत्न करू या, असे आवाहन सुप्रसिध्द सिनेअभिनेते आमिर खान यांनी केले.येथील प्रियदर्शिनी सभागृहात चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूरतर्फे जलसाक्षरता अभियान, जनशक्ती आणि जनशक्ती संमेलन व संवाद कार्यक्रम सोबतच जलशक्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमांमध्ये वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूर नगरपालिकेचे अध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते. आमीर खान यांनी उपस्थितांना संबोधित करताना पाणी फाउंडेशन या संस्थेमार्फत केलेल्या कार्याचा संक्षिप्त लेखाजोखा मांडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे या कार्यक्रमात आपली भेट जलपुरूष राजेंद्रसिंह यांच्यासोबत झाली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आज योग जुळून आला.चंद्रपूर येथे मी पहिल्यांदाच आलो असून आज जलशक्ती कार्यक्रमाच्या मंचावर त्यांच्या भेटीचा योग आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जमिनीत पाण्याचे पुनर्भरण गरजेचे- राजेंद्र सिंहमहाराष्ट्र जमिनीची भूजल पातळी खालावली आहे. कारण येथे आजवर केवळ जमिनीच्या पोटातून पाणी काढण्याचे काम झाले आहे. मात्र पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत टाकण्याचे कुठलेच प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पाणी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवायची असेल तर बाष्पीभवन रोखून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम आम्हाला करावे लागेल. हे एका व्यक्तीचे काम होत नसून यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास महाराष्ट्राच्या जलपातळीमध्ये निश्चित वाढ होईल, असा विश्वास जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.चिमुकल्या सैनिकांनी घेतले आमिरसोबत भोजनचंद्रपूर : दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमांना हजेरी लावून सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी नव्यानेच उभी झालेल्या चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला भेट दिली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. सैनिकी शाळेमध्ये आमीर खानचे आगमन होताच शाळेचे प्राचार्य स्कॉरडन लीडर नरेश कुमार व उपप्राचार्य लेफ्टनन कॅडर अनमोल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमीर खान यांनी सैनिकी शाळेच्या बांधकाम, प्रशासन, शैक्षणिक सुविधा सोबतच विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाºया विविध सुविधांविषयी माहितीपटाद्वारे माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारतातील २६ व्या सैनिकी शाळेच्या निर्मितीमागची भूमिका व याबाबतचा घटनाक्रम सांगितला. यानंतर आमीर खानने शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसमवेत भोजनाचा आनंद घेतला.जलसाक्षरतेचे काम करणाऱ्यांचा सत्कारया कार्यक्रमामध्ये जलसाक्षरतेची उल्लेखनीय काम केलेल्या डॉक्टर सुमित पांडे, माधव कोटस्थाने, रमाकांत बापू कुलकर्णी, डॉ.श्रीनिवास वडगबाळकर, किशोर धारिया, राजेश पंडित, स्नेहल दोंदे, डॉ. काशीवार, प्रभू नुसाजी गव्हारे, माधुरी देशकर, जनबंधू, राहुल गुडगाणे यासर्व जलनायक व जल प्रेमी यांचा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिष शर्मा, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, यासोबतच चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी तथा विभागीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक अशोक खडसे, अप्पर संचालक प्रशांत खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय धवने यांनी केले.