शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:00 IST

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलीे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा, तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे.

ठळक मुद्देआमिर खान : जलशक्ती कार्यशाळेत तीन समाजसेवी व्यक्तींनी दिला पाणी व्यवस्थापनाचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलीे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा, तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील जवळपास साडेचार हजार गावांमध्ये जलदूतांच्या सहाय्याने या संस्थेची कार्ये केली जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाने पाणी फाऊंडेशनच्या अभियानात सहभागी व्हावे, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आता एकत्रित प्रयत्न करू या, असे आवाहन सुप्रसिध्द सिनेअभिनेते आमिर खान यांनी केले.येथील प्रियदर्शिनी सभागृहात चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूरतर्फे जलसाक्षरता अभियान, जनशक्ती आणि जनशक्ती संमेलन व संवाद कार्यक्रम सोबतच जलशक्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमांमध्ये वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूर नगरपालिकेचे अध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते. आमीर खान यांनी उपस्थितांना संबोधित करताना पाणी फाउंडेशन या संस्थेमार्फत केलेल्या कार्याचा संक्षिप्त लेखाजोखा मांडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे या कार्यक्रमात आपली भेट जलपुरूष राजेंद्रसिंह यांच्यासोबत झाली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आज योग जुळून आला.चंद्रपूर येथे मी पहिल्यांदाच आलो असून आज जलशक्ती कार्यक्रमाच्या मंचावर त्यांच्या भेटीचा योग आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जमिनीत पाण्याचे पुनर्भरण गरजेचे- राजेंद्र सिंहमहाराष्ट्र जमिनीची भूजल पातळी खालावली आहे. कारण येथे आजवर केवळ जमिनीच्या पोटातून पाणी काढण्याचे काम झाले आहे. मात्र पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत टाकण्याचे कुठलेच प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पाणी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवायची असेल तर बाष्पीभवन रोखून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम आम्हाला करावे लागेल. हे एका व्यक्तीचे काम होत नसून यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास महाराष्ट्राच्या जलपातळीमध्ये निश्चित वाढ होईल, असा विश्वास जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.चिमुकल्या सैनिकांनी घेतले आमिरसोबत भोजनचंद्रपूर : दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमांना हजेरी लावून सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी नव्यानेच उभी झालेल्या चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला भेट दिली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. सैनिकी शाळेमध्ये आमीर खानचे आगमन होताच शाळेचे प्राचार्य स्कॉरडन लीडर नरेश कुमार व उपप्राचार्य लेफ्टनन कॅडर अनमोल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमीर खान यांनी सैनिकी शाळेच्या बांधकाम, प्रशासन, शैक्षणिक सुविधा सोबतच विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाºया विविध सुविधांविषयी माहितीपटाद्वारे माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारतातील २६ व्या सैनिकी शाळेच्या निर्मितीमागची भूमिका व याबाबतचा घटनाक्रम सांगितला. यानंतर आमीर खानने शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसमवेत भोजनाचा आनंद घेतला.जलसाक्षरतेचे काम करणाऱ्यांचा सत्कारया कार्यक्रमामध्ये जलसाक्षरतेची उल्लेखनीय काम केलेल्या डॉक्टर सुमित पांडे, माधव कोटस्थाने, रमाकांत बापू कुलकर्णी, डॉ.श्रीनिवास वडगबाळकर, किशोर धारिया, राजेश पंडित, स्नेहल दोंदे, डॉ. काशीवार, प्रभू नुसाजी गव्हारे, माधुरी देशकर, जनबंधू, राहुल गुडगाणे यासर्व जलनायक व जल प्रेमी यांचा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिष शर्मा, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, यासोबतच चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी तथा विभागीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक अशोक खडसे, अप्पर संचालक प्रशांत खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय धवने यांनी केले.