शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

बसेसच्या फेऱ्या कमी, महामंडळाला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:52 AM

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला ...

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला उभारी मिळाली नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. परंतु, त्याला प्रवाशांनी पाठ दाखवली. आता बसफेऱ्या नियमीत धावत आहेत. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसफेरी धावत नाही. तसेच रात्रकालीन बसफेऱ्यामध्ये बदलाव करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता बसफेऱ्या धावत नाही.

पूर्वी चारही आगारातून दीड हजारच्या सुमारास बसफेऱ्या धावायचा. आता ११०० च्या जवळपास बसफेऱ्या धावत आहेत. त्यातहुी पूर्वीप्रमाणे प्रवासी मिळत नाही. त्यामुळे त्यामुळे महामंडळाला दररोज सुमारे पाच लाखांचा फटका बसत आहे. त्यामुळे पूर्वीच आर्थिक तोट्यात असलेले महामंडळ पुन्हा तोट्यात जात आहे.

काही बस मालवाहतूकसाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे आता २३० बस धावत आहेत. ग्रामीण भागातही मागणीनुसार बसेफेऱ्या पोहचल्या आहेत. पूर्वी विभागाचे उत्पन्न सुमारे ३० लाखांच्या जवळपास असायचे आता २० लाखांच्या जवळपास उत्पन्न होत आहे.

- आर. एन. पाटील,

विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

जिल्ह्याचे उत्पन्न घटले

चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वी १५०० च्या जवळपास बसफेऱ्या ९० हजार किमी धावायचा. त्यातून मंडळाला २५ ते ३० लाखांपर्यंत उत्पन्न मिळायचे. कोरोनानंतर ११०० बसफेऱ्या ७७ हजार किमी धावत आहेत. त्यातून केवळ २० लाख उत्पन्न मिळत आहे.