शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 14:42 IST

कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही.

ठळक मुद्दे स्थलांतरित नागरिक परतले; मात्र आयुष्य होरपळले

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. याचा सर्वाधिक फटका जिवती तालुक्यातील मजुरांना बसला आहे. कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. क्वारंटाईनचे १४ दिवस जणू एखादी शिक्षाच हे मजूर भोगत आहे की काय, अशी भिषण परिस्थितीत ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली.तालुक्यातील मालगुडा व इतर भागातील मोठ्या संख्येने मजूर रोजगारासाठी लातूर जिल्ह्यात गेले होते. मात्र कोरोनाचा हाहाकार माजला आणि कामधंदा बाजुला राहिला. दिवसभर काम करून प्रपंच भागविण्यासाठी हे मजूर इच्छा नसतानाही गाव सोडून गेले. मनात विविध स्वप्न बाळगून कुठल्याही सोयी-सुविधा नसताना श्रमाची कामे करून सुखी जीवन जगणाऱ्या या मजुरांना कोरोनाची लागण तर झाली नाही. मात्र कोरोनाचा अप्रत्यक्ष मार बसला आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्याचा पट्टा पडला. घरी येण्याची घाई त्यात कोरोनाचे संकट. महिनाभर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एका शेतात कारखानदाराच्या आधारावर दिवस काढले. हाताला काम नसल्याने जवळ असलेले पैसेही संपून गेले. शासनाने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना स्वगावी पोहोचविण्याचे आदेश काढले. हातात दमडीही नसताना हिमतीने गाव गाठले. आरोग्य तपासणीही झाली. चौदा दिवस गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या दमपूर मोहदा येथील आश्रमशाळेत त्यांना क्वारंटाईन करून प्रशासन मोकळे झाले. ग्रामस्थ कशीबशी पोट भरण्यासाठी भाजीभाकरी देतात. मालगुडयातील ९० च्या जवळपास महिला-पुरूष मजूर व त्यांच्या सोबतीला असलेली त्यांची मुलेही नशिबाचे हे भोग भोगत आहेत. आधी महिनाभर लातूर जिल्ह्यात आणि १४ दिवस येथे विनाकारण बसून राहावे लागत असल्याने आता या मजुरांना मुलाबाळांच्यापोषणाची चिंता सतावत आहे. उन्हाळाभर लातूर जिल्ह्यात काम करून पदरात काही पैसे जमा होईल, असे या मजुरांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही.

स्थलांतरित मजुरांचा परतीचा ओघ सुरूचतालुक्यातून कामाच्या शोधात मजूर तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी तर काही मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. आतापर्यंत तालुक्यात अठराशे मजूर स्वगावी पोहोचले असून तेराशे मजुरांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. आणखी ५०९ नागरिक अजूनही ठिकठिकाणी क्वारंटाईनमध्ये भोग भोगत आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने येथे क्वारंटाईन असलेल्या पांडुरंग तुकाराम आडे या मजुराला विचारणा केली असता गेल्या दीड महिन्यापासून आम्ही बसूनच असल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण जाणार असल्याचे त्याने सांगितले. जवळ असलेला पैसाही संपला. प्रशासनाने आणून सोडले मात्र पुढे कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे पुढील दिवस आता कसे काढायचे, अशी खंतही त्याने लोकमतजवळ व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस