शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 14:42 IST

कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही.

ठळक मुद्दे स्थलांतरित नागरिक परतले; मात्र आयुष्य होरपळले

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. याचा सर्वाधिक फटका जिवती तालुक्यातील मजुरांना बसला आहे. कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. क्वारंटाईनचे १४ दिवस जणू एखादी शिक्षाच हे मजूर भोगत आहे की काय, अशी भिषण परिस्थितीत ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली.तालुक्यातील मालगुडा व इतर भागातील मोठ्या संख्येने मजूर रोजगारासाठी लातूर जिल्ह्यात गेले होते. मात्र कोरोनाचा हाहाकार माजला आणि कामधंदा बाजुला राहिला. दिवसभर काम करून प्रपंच भागविण्यासाठी हे मजूर इच्छा नसतानाही गाव सोडून गेले. मनात विविध स्वप्न बाळगून कुठल्याही सोयी-सुविधा नसताना श्रमाची कामे करून सुखी जीवन जगणाऱ्या या मजुरांना कोरोनाची लागण तर झाली नाही. मात्र कोरोनाचा अप्रत्यक्ष मार बसला आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्याचा पट्टा पडला. घरी येण्याची घाई त्यात कोरोनाचे संकट. महिनाभर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एका शेतात कारखानदाराच्या आधारावर दिवस काढले. हाताला काम नसल्याने जवळ असलेले पैसेही संपून गेले. शासनाने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना स्वगावी पोहोचविण्याचे आदेश काढले. हातात दमडीही नसताना हिमतीने गाव गाठले. आरोग्य तपासणीही झाली. चौदा दिवस गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या दमपूर मोहदा येथील आश्रमशाळेत त्यांना क्वारंटाईन करून प्रशासन मोकळे झाले. ग्रामस्थ कशीबशी पोट भरण्यासाठी भाजीभाकरी देतात. मालगुडयातील ९० च्या जवळपास महिला-पुरूष मजूर व त्यांच्या सोबतीला असलेली त्यांची मुलेही नशिबाचे हे भोग भोगत आहेत. आधी महिनाभर लातूर जिल्ह्यात आणि १४ दिवस येथे विनाकारण बसून राहावे लागत असल्याने आता या मजुरांना मुलाबाळांच्यापोषणाची चिंता सतावत आहे. उन्हाळाभर लातूर जिल्ह्यात काम करून पदरात काही पैसे जमा होईल, असे या मजुरांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही.

स्थलांतरित मजुरांचा परतीचा ओघ सुरूचतालुक्यातून कामाच्या शोधात मजूर तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी तर काही मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. आतापर्यंत तालुक्यात अठराशे मजूर स्वगावी पोहोचले असून तेराशे मजुरांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. आणखी ५०९ नागरिक अजूनही ठिकठिकाणी क्वारंटाईनमध्ये भोग भोगत आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने येथे क्वारंटाईन असलेल्या पांडुरंग तुकाराम आडे या मजुराला विचारणा केली असता गेल्या दीड महिन्यापासून आम्ही बसूनच असल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण जाणार असल्याचे त्याने सांगितले. जवळ असलेला पैसाही संपला. प्रशासनाने आणून सोडले मात्र पुढे कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे पुढील दिवस आता कसे काढायचे, अशी खंतही त्याने लोकमतजवळ व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस