शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडा

By admin | Updated: December 4, 2015 01:24 IST

परिसरातील शेतकऱ्यांच्या घोडाझरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्याकरिता चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते ...

अशोक नेते : घोडाझरी विकास परिषदेत आंदोलनाचा इशारातळोधी (बा.): तळोधी (बा.) परिसरातील शेतकऱ्यांच्या घोडाझरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्याकरिता चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत नुकतीच घोडाझरी विकास परिषद तळोधी (बा.) येथे पार पडली. या घोडाझरी विकास परिषदेत गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका खासदार अशोक नेते यांनी घेतली.या विकास परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, तालुका सरचिटणीस गजानन पाथोडे, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, पं.स. सदस्य दिवाकर कामडी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील ५२ गावांचे शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक भाषणातून ईश्वर कामडी यांनी १ नोव्हेंबर २०१५ ला घोडाझरी पाणी प्रश्नांवर पहिली विकास परिषद घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची यादी वाचनू दाखवली तर भाजपाचे जिल्हा महामंत्री संजय गजपूरे यांनी घोडाझरी तलावाचा इतिहास, कमी पावसामुळे परिसरात निर्माण झालेला दुष्काळ, गोसीखुर्द धरणाचे कालवाच्या कामातील त्रुटी, यावर प्रकाश टाकला. गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात टाकल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना काय फायदा होईल, हे सांगून आजपर्यंत घोडाझरी तलावाच्या पाणी प्रश्नांवर शासनाने शेतकऱ्यांचे मतप्रदर्शन लक्षात घेतले असते आज ही वेळ आली नसती असे सांगून तलावात पाणी सोडण्यासोबत तलावाच्या वितरणिकाचे सिमेंटीकरण व साफसफाई किती आवश्यक आहे, हे खासदार नेते यांच्या निदर्शनात आणून दिले.यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार नेते यांनी आपण काम करणारा माणूस असून गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शेतकऱ्यांना ग्वाही दिली व या संदर्भाचे गोसीखुर्द प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत करावा, यासाठी दोन दिवसापूर्वीच पत्र दिल्याचे आवर्जुन सांगितले. घोडाझरी सिंचन क्षेत्रात ५२ गावांचा समावेश असून तलावात पाणी नसल्याने या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही व एका पाण्याने पिक गेले. अशावेळी शेतकऱ्यांची काय अवस्था होते, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी मागील दोन महिन्यात घोडाझरी पाणी प्रश्नांवर घेतलेली ही तिसरी बैठक असल्याचे सांगितले. राज्यशासन आणि केंद्र शासन शेतकऱ्याप्रति सकारात्मक आहे. परंतु त्यांना शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नावर काम करण्यास पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी खासदारांकडे होमदेव मेश्राम यांनी करताच शेतकऱ्यांनी दुष्काळ नको, पाणी हवे अशाप्रकारची मागणी करुन त्यांना पुढे बोलूच दिले नाही. यावेळी उपस्थितांनी खासदार नेते यांना कमी खर्चात, कमी वेळात व जास्त कष्ट न घेता गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात कसे सोडता येईल याची प्रतिकृतीच सादर केली. एकंदरीत या बैठकीला उपस्थित शेतकरी पाणी प्रश्नांवर आक्रमक व अभ्यासंपूर्ण तयारी करुन हजर असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र खासदारांनी दिलेली ग्वाही पुढील शेतीच्या हंगामापूर्वी पूर्ण करणार काय, राजकारणी व्यक्तीचे आश्वासन खरे मानायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तरीही आश्वासनाची पूर्तता होईल काय, हे येणारा काळच सांगू शकते. (वार्ताहर)