शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

३६२ कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया झाली सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:01 IST

१२४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे भागफोड : प्रकल्प परिसरात संतप्त भावना

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत खाणीतील कोळसा वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सास्ती ते बाबूपेठ, असा नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये राजुरा तालुक्यातील १२४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. शेतजमिनीचे तुकडे होणार असल्यामुळे भविष्यात शेती करणे अवघड होईल, या भीतीपोटी या प्रकल्पाला संबंधित शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झाला आहे.

रेल्वे बोर्डाने २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सास्ती-बाबूपेठ या १३.११४ किलोमीटर लांबच्या रेल्वेलाइन प्रकल्पाला ३६२.८१ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने ९ जुलै २०२५ रोजी राजपत्र काढून या रेल्वेलाइन प्रकल्पासाठी कढोली येथील ४९ शेतकऱ्यांच्या १४.८६ हेक्टर, गोवरी येथील २६ शेतकऱ्यांच्या १९.७५ हेक्टर, तसेच मानोली येथील ४९ शेतकऱ्यांच्या ६.७५ हेक्टर, अशा एकूण १२४ शेतकऱ्यांच्या ३०८.१३ हेक्टरपैकी ४१.३७हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १७ जुलै रोजी व एसडीओ व तहसिलदारांनी दि. २८ जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे.

प्रकल्पामुळे कोणता फायदा होणार ?नव्या रेल्वे रुळामुळे एकाच ठिकाणाहून कोळश्याची वाहतूक केली जाईल. यामुळे जडवाहनामुळे रस्त्यावर उडणारी धूळ कमी होईल. ट्रकमुळे होणारे रस्ते अपघात कमी होईल. काही प्रमाणात प्रदूषणमुक्त होईल.

रेल्वे रुळामुळे शेतकऱ्यांचे काय नुकसान होणारवेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत तीन वेगवेगळ्या कोळसा खाणी आहेत. आधीच या खाणींसह राजुरा तालुक्यातील सोन्यासारखी शेती वेकोलीच्या घशात गेली आहे. या कोळसा खाणींमुळे परिसरातील शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. प्रदूषण, पाण्याच्या समस्या, वाढती उष्णता या कारणांनी शेती करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेती तुकड्यात खरेदी करणार असल्याने भविष्यात शेती करण्याची समस्या उद्भवणार आहे. वर्धा नदी लागून असल्याने पुराचीही समस्या निर्माण होईल.

"वेकोलीसाठी असलेल्या रेल्वेलाइनसाठी शेतकऱ्यांच्या लाखमोलाच्या जमिनीचे तुकडे न करता वेकोलीने संपूर्ण जमीन अधिग्रहित करून त्या जमिनीच्या भागातून रेल्वेलाइन काढावी. जमीन अधिग्रहित करून मोबदला प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यात याव्यात, अन्यथा आम्ही कोणत्याही परिस्थित जमीन देणार नाही."- किशोर हिंगाणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कढोली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर