शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

३६२ कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया झाली सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:01 IST

१२४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे भागफोड : प्रकल्प परिसरात संतप्त भावना

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत खाणीतील कोळसा वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सास्ती ते बाबूपेठ, असा नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये राजुरा तालुक्यातील १२४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. शेतजमिनीचे तुकडे होणार असल्यामुळे भविष्यात शेती करणे अवघड होईल, या भीतीपोटी या प्रकल्पाला संबंधित शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झाला आहे.

रेल्वे बोर्डाने २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सास्ती-बाबूपेठ या १३.११४ किलोमीटर लांबच्या रेल्वेलाइन प्रकल्पाला ३६२.८१ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने ९ जुलै २०२५ रोजी राजपत्र काढून या रेल्वेलाइन प्रकल्पासाठी कढोली येथील ४९ शेतकऱ्यांच्या १४.८६ हेक्टर, गोवरी येथील २६ शेतकऱ्यांच्या १९.७५ हेक्टर, तसेच मानोली येथील ४९ शेतकऱ्यांच्या ६.७५ हेक्टर, अशा एकूण १२४ शेतकऱ्यांच्या ३०८.१३ हेक्टरपैकी ४१.३७हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १७ जुलै रोजी व एसडीओ व तहसिलदारांनी दि. २८ जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे.

प्रकल्पामुळे कोणता फायदा होणार ?नव्या रेल्वे रुळामुळे एकाच ठिकाणाहून कोळश्याची वाहतूक केली जाईल. यामुळे जडवाहनामुळे रस्त्यावर उडणारी धूळ कमी होईल. ट्रकमुळे होणारे रस्ते अपघात कमी होईल. काही प्रमाणात प्रदूषणमुक्त होईल.

रेल्वे रुळामुळे शेतकऱ्यांचे काय नुकसान होणारवेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत तीन वेगवेगळ्या कोळसा खाणी आहेत. आधीच या खाणींसह राजुरा तालुक्यातील सोन्यासारखी शेती वेकोलीच्या घशात गेली आहे. या कोळसा खाणींमुळे परिसरातील शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. प्रदूषण, पाण्याच्या समस्या, वाढती उष्णता या कारणांनी शेती करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेती तुकड्यात खरेदी करणार असल्याने भविष्यात शेती करण्याची समस्या उद्भवणार आहे. वर्धा नदी लागून असल्याने पुराचीही समस्या निर्माण होईल.

"वेकोलीसाठी असलेल्या रेल्वेलाइनसाठी शेतकऱ्यांच्या लाखमोलाच्या जमिनीचे तुकडे न करता वेकोलीने संपूर्ण जमीन अधिग्रहित करून त्या जमिनीच्या भागातून रेल्वेलाइन काढावी. जमीन अधिग्रहित करून मोबदला प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यात याव्यात, अन्यथा आम्ही कोणत्याही परिस्थित जमीन देणार नाही."- किशोर हिंगाणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कढोली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर