शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मजुरांना सोडण्यास लालपरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

मजुरांना त्यांच्या गावात एसटीने घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मजुरांनी आपल्या नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर यादी प्रमाणित करून ती तहसीलदारांमार्फत आगार प्रमुखांना देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर विभाग : यादी प्राप्त होताच धावणार बस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळगावी नेऊन सोडण्यासाठी चंद्रपूर विभागातील बसेस सज्ज झाल्या आहेत. आगाराकडे मजुरांची यादी येताच बसेस सोडण्यात येतील, असे विभाग प्रमुख आर. एन. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी राजूरा डेपोमधून मजुरांना घेऊन तीन बस गोंडपिपरीकडे रवाना झाल्या आहेत.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी सर्व वाहक-चालक व कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. मजुरांना त्यांच्या गावात एसटीने घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मजुरांनी आपल्या नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर यादी प्रमाणित करून ती तहसीलदारांमार्फत आगार प्रमुखांना देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे. तहसील प्रशासनामार्फत मजुरांची यादी प्राप्त होताच या बसेस मजुरांना घेवून रवाना होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.पुन्हा गावागावातलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना राज्य व परराज्यात एसटीने नेण्यात येणार असल्याचे पत्र ९ मे रोजी मुख्य सचिवांनी काढले आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एकत्रित समन्वय साधून आढावा घ्यावा व सर्व प्रवाशी वाहतूक सुरक्षीत होईल, याची दक्षता घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाने २३ मार्चपासून बंद असलेली एसटी पुन्हा धावणार आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व बसेस आगारात उभ्या आहेत. मागणी न आल्यास पुन्हा १७ मे पर्यंत एसटीची चाके बंदच राहणार आहेत. येथील आगारातील सर्व कर्मचारी सज्ज आहेत. गाड्यांची साफसफाई करून ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक