लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळगावी नेऊन सोडण्यासाठी चंद्रपूर विभागातील बसेस सज्ज झाल्या आहेत. आगाराकडे मजुरांची यादी येताच बसेस सोडण्यात येतील, असे विभाग प्रमुख आर. एन. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी राजूरा डेपोमधून मजुरांना घेऊन तीन बस गोंडपिपरीकडे रवाना झाल्या आहेत.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी सर्व वाहक-चालक व कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. मजुरांना त्यांच्या गावात एसटीने घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मजुरांनी आपल्या नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर यादी प्रमाणित करून ती तहसीलदारांमार्फत आगार प्रमुखांना देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे. तहसील प्रशासनामार्फत मजुरांची यादी प्राप्त होताच या बसेस मजुरांना घेवून रवाना होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.पुन्हा गावागावातलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना राज्य व परराज्यात एसटीने नेण्यात येणार असल्याचे पत्र ९ मे रोजी मुख्य सचिवांनी काढले आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एकत्रित समन्वय साधून आढावा घ्यावा व सर्व प्रवाशी वाहतूक सुरक्षीत होईल, याची दक्षता घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाने २३ मार्चपासून बंद असलेली एसटी पुन्हा धावणार आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व बसेस आगारात उभ्या आहेत. मागणी न आल्यास पुन्हा १७ मे पर्यंत एसटीची चाके बंदच राहणार आहेत. येथील आगारातील सर्व कर्मचारी सज्ज आहेत. गाड्यांची साफसफाई करून ठेवण्यात आली आहे.
मजुरांना सोडण्यास लालपरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST
मजुरांना त्यांच्या गावात एसटीने घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मजुरांनी आपल्या नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर यादी प्रमाणित करून ती तहसीलदारांमार्फत आगार प्रमुखांना देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे.
मजुरांना सोडण्यास लालपरी सज्ज
ठळक मुद्देचंद्रपूर विभाग : यादी प्राप्त होताच धावणार बस