शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:29 AM

रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा रूग्णालयात केलेली नसल्यामुळे अनेक रूग्णांची हेडसांड होत आहे.

ठळक मुद्देरुग्णांची हेळसांड : रुग्णांना करतात रेफर टू चंद्रपूर

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करून शंभर खाटांचे श्रेणीवर्धीत रूग्णालय तयार करण्यात आले. मात्र आजच्या स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथील उपजिल्हा रूग्णालयात केलेली नसल्यामुळे अनेक रूग्णांची हेडसांड होत आहे. बहुतांश रूग्णांना रेफर टू चंद्रपूर, गडचिरोली केले जात आहे. रूग्णांची होणारी हेडसांड थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र आरोग्य विकास प्रकल्पांतर्गत येथील ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रूग्णालयामध्ये करण्यात आलेले आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दिग्वीजय खानविलकर यांच्या हस्ते सदर रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा ५ मे २००२ रोजी मोठया दिमाखात पार पडला. यावेळी तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री एकनाथराव गायकवाड उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सदर रूग्णालयात स्त्रि रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, शल्यचिकीत्सक हे महत्वाचे पद नेहमीसाठी भरण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु सहा वर्षांचा कार्यकाळ लोटून गेला. मात्र अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात आली नाही.येथील उपजिल्हा रूग्णात डॉ. सुर्यकांत बाबर हे वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत आहे, तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. उज्वलकुमार इंदूरकर, डॉ. चंद्रागडे, डॉ. मेश्राम हे कर्तव्य बजावित आहे. चिमूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवतकर यांची मूल उपजिल्हा रूग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात आलेली नाही. सदर रूग्णालयात रोज किमान दोनशे ते अडीचशेच्या जवळपास रूग्णांची नोंदणी होत आहे.रूग्णालयात आयुष क्लिनीक कार्यरत आहे. आयुष क्लिनीकमधील डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार केला जात आहे. उपजिल्हा रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टराअभावी रूग्णांवर योग्य उपचार होत नाही. काही रूग्णांना चंद्रपूर व इतर ठिकाणी रेफर करावे लागते. यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करणे गरजेचे आहे.रुग्णांसोबत वाईट वागणूकग्रामीण भागातील रूग्ण मोठया प्रमाणावर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ येत असतात. मात्र येथील काही डॉक्टर रूग्णांशी सामंजस्याने बोलत नसल्याने डॉक्टरांप्रति तिव्र रोष व्यक्त केला जात आहे. तब्बल ११ वर्षानंतर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांचे पद कायमस्वरूपी भरण्यात आलेले आहे. रूग्णालय प्रशासन साभाळण्याची संपुर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिक्षकांची असते, त्यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल