शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

300 बालकांना कोविड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 5:00 AM

बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १०७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ९५१ वर पोहोचली आहे. 

ठळक मुद्देनवे १०७ बाधित : लक्षणे दिसताच बालकांना ठेवा दूर

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत ० ते ५ वयोगटातील तब्बल २९९ बालकांना कोरोना विषाणूने आपल्या कवेत घेतले आहे. बालकांना हा आजार निश्चितच पालक व किंवा नातेवाईकांकडून होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पालकांना किंवा घरात येणाºया कोण्याही व्यक्तींमध्ये लक्षणे दिसली की बालकांना त्यांच्यापासून दूर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. बुधवारी १०७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून ६१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.बुधवारी मृत झालेल्या बाधितामध्ये रेल्वे कॉलनी चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरूष व भारळा ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ बाधितांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १०७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १७ हजार ९५१ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ४८३ झाली आहे. सध्या दोन हजार १९१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३२ हजार १११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे,  त्यापैकी एक लाख १२ हजार ५७० नमुने निगेटिव्ह आले आहे.बाजारात गर्दी ओसरली, मात्र नियमांचे पालन नाहीदिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील बाजारपेठेत मागील चार-पाच दिवसांपासून तुंबळ गर्दी उसळली होती. ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या गर्दीमुळे आणि कापडाच्या दुकानातील ‘ट्रायल’ कोरोना संसर्गाची शक्यता बळावली होती. बुधवारपासून बाजारपेठेत गर्दी कमी झाली आहे. मात्र नागरिक अद्यापही नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते. अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. सोशल डिस्टन्सिंग तर कोणत्याच दुकानात दिसून येत नाही. नागरिकांनी मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या