शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कर्मयोगी बाबा आमटे यांची शैक्षणिक परंपरा तिसऱ्या पिढीनेही जोपासली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:37 IST

आनंदवनची कीर्ती जगभरात पोहोचली. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता कर्मयोगी बाबा आमटे यांनी पुढाकार घेतला. त्यातून आनंदवन विद्यालय आकाराला आले. शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर कार्यरत आहेत.

ठळक मुद्देयंदापासून नववीचे सत्र : आनंदवन विद्यालयाने विद्यार्थ्यांना दिले जगण्याचे बळ

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आनंदवनची कीर्ती जगभरात पोहोचली. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता कर्मयोगी बाबा आमटे यांनी पुढाकार घेतला. त्यातून आनंदवन विद्यालय आकाराला आले. शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर कार्यरत आहेत. यंदापासून आनंदवनात इयत्ता ९ वीचा वर्ग सुरू करण्यात आला. आनंदवनातील शैक्षणिक वर्तुळ कर्मयोगी बाबांच्या तिसºया पिढीने पूर्ण केला आहे.कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांनी कुष्ठरोगी बांधवांना सोबत घेवून आनंदवनाची स्थापना केली. आनंदवनात कुष्ठरोगी बांधवांसोबत अंध, अपंग स्वत:च्या पायावर उभे राहून समाजात ताठ मानेने जगत आहे. कुष्ठरोगी व दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प कर्मयोगी बाबांनी पूर्ण केला. आनंदवन विद्यालयातून शिक्षण घेवून शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. वरोरा परिसरातील युवकांना चांगले शिक्षण मिळावे, याकरिता आनंदनिकेतन महाविद्यालयाचीही स्थापना केली. अकरावीपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. तालुक्यात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकºयांना नवीन संशोधन मिळावे, याकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. जिल्हा परिषदने इयत्ता १ ते ८ वी पर्यंतची शाळा सुरू आहे. आठवीनंतर आनंदवन परिसरातील मुले ९ वी व १० वीच्या शिक्षणाकरिता इतरत्र जात होते. ही बाब बाबांच्या तिसºया पिढीला लक्षात येताच त्याकरिताही पुढाकार घेतला. शैक्षणिक सत्रापासून आनंद विद्यालयाला शासनाने मान्यता दिली. प्रथमच इयत्ता ९ वीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. सेमी इंग्लिश मिडियमध्ये शिक्षण दिले जाणार असून त्याकरिता तज्ज्ञ अध्यापक वर्गही नेमण्यात आला असल्याची माहिती महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी दिली. अंध व अपंग मुक बधीर मुलांकरिता आनंदवनात शाळा आहे. त्यांना दहावीची परीक्षा खासगीरित्या द्यावी लागते. परंतु आता आनंवदनात विद्यालय सुरू झाल्याने त्यांचीही मोठी सोय झाली आहे.