शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

२२ वर्षांपासून करंजी एमआयडीसी ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

करंजी एमआयडीसी सुरू करा, अन्य शेतजमिनी परत करा आक्सापूर : १९८० च्या दशकात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील सुमारे ३५ ...

करंजी एमआयडीसी सुरू करा, अन्य शेतजमिनी परत करा

आक्सापूर : १९८० च्या दशकात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील सुमारे ३५ एकर मोक्यावरची शेतजमीन औद्योगिक प्रयोजनार्थ शासनाने अधिग्रहित केली. तत्कालीन बाजारमूल्याने शेतकऱ्यांना मोबदलादेखील मिळाला. मात्र एवढा प्रदीर्घ काळ लोटूनही करंजी एमआयडीसीच्या जागेवर एकही उद्योग उभा राहिला नाही. येथील जागा केवळ आबालवृद्धांच्या विरंगुळा आणि शतपावलीपुरती उरली आहे. यामुळे करंजी एमआयडीसीकडून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्यात सातत्याने वाढणाऱ्या बेरोजगारांच्या हाताला काम द्या, अन्यथा शेतजमिनी परत करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल गोंडपिपरी तालुका उद्योगविरहित आहे. परिणामी सातत्याने वाढणाऱ्या बेरोजगारांच्या हाताला तालुक्यात कामे नाहीत. शेती आणि शेतमजुरी हा मुख्य व्यवसाय असलेल्या या तालुक्यात शेतीचा हंगाम आटोपला की येथील मंडळी रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकतात. अशावेळी मात्र लगतच्या तेलंगणा राज्याचा गोंडपिपरीकरांना मोठा आधार वाटतो. मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी तालुक्यातील मंडळी आपल्या बिऱ्हाडासह काही महिन्यांसाठी स्थलांतरित होतात. अशा कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. गतवर्षी कोरोनामुळे पुकारलेल्या लाॅकडाऊननंतर जेव्हा मजुरांचा स्वगृही परतीचा प्रवास सुरू झाला, त्यावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या या कुटुंबीयांना घर गाठेपर्यत मोठ्या यातना सोसाव्या लागल्या. याचा प्रत्यय सर्वांना आला.

बॉक्स

उद्योग नाही, केवळ वृक्षलागवड

करंजी एमआयडीसीवर उद्योग उभारणीसाठी आजपर्यंत राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही पत्रव्यवहार केला. मात्र याचा काहीएक फायदा झाला नाही. या भूखंडावर भौतिक सुविधा आणि सामाजिक वनीकरणामार्फतीने वृक्षलागवड या पलीकडे तिसरे काम झाले नाही. असे असताना राजुरा विधानसभेची निवडणूक लढताना बहुतांश उमेदवारांच्या जाहीरनाम्याचा करंजी एमआयडीसी हा विषय ठरलेलाच. एकदा निवडणुका झाल्या की पाच वर्षासाठी हा विषय दुर्लक्षित पडतो. विशेष म्हणजे, तालुक्याला लागून वर्धा, वैनगंगा आणि अंधारीसारख्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुका आजही उद्योगाविना विकासापासून दूर आहे.

कोट

मोठे उद्योग उभे राहू शकत नसतील तर स्थानिक महिला बचत गट, सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगारांना येथील भूखंडाचे वाटप करावे.

- समीर निमगडे,

सदस्य ग्रा.पं.करंजी.

बॉक्स

पालकमंत्र्यांनीच आता आपल्या गावाकडे लक्ष द्यावे

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार करंजी गावचे सुपुत्र आहेत. या गावाच्या मातीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार सरपंच तर भाऊ विलास वडेट्टीवार करंजी गावाचे उपसरपंच राहिले. करंजी गावाशी त्यांची नाळ आजही जुळली आहे. त्यांनीच आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

100721\img-20210708-wa0088.jpg

फोटो