शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

‘त्या’ गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 01:03 IST

नागभीड नगरपालिका स्थापन करण्यासाठी परिसरातील काही गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला.

योजनांचा लाभ नाही : नागभीड नगरपालिकेत गावांचा समावेशचंद्रपूर : नागभीड नगरपालिका स्थापन करण्यासाठी परिसरातील काही गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला. आता याचा परिणाम असा झाला की, या गावातील रोजगार हमी योजनेची कामे बंद झाली आहेत. निधी असतानाही ग्रामपंचायतींची विकास कामे होताना दिसून येत नाही. या गावांना भविष्यात ग्रामीण भागातील अनेक योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.शासनाने ११ एप्रिल २०१६ ला नागभीड नगर परिषदेची घोषणा केली. यात एकूण १२ गावांना जोडण्यात आले. यातील ९ गावांनी पालिकेत समाविष्ट होण्यास स्पष्ट नकार दिला. आमसभेत ठरावसुद्धा घेतला. पालिकेसाठी २५ हजार लोकसंख्येची अट आहे. नागभीड ग्रामपंचायतची लोकसंख्या केवळ १२ हजार ७९० आहे. उर्वरित लोकसंख्येची जुळवाजुळव करण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरवरील गावांना यात अंतर्भूत करण्यात आले. त्यात बामणी, बोथली, डोंगरगाव, तिवर्ला तुकूम, तिवर्ला गावगन्ना, नवखळा, चिंचोली खुर्द या गावांचा समावेश आहे. या गावांसोबतच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्येसुद्धा पालिकेत सहभागी न होण्याचा ठराव घेण्यात आला आहे.विशेष असे की, नगररचना विभागनेसुद्धा याला विरोध केला. नियमाप्रमाणे ३५ टक्के अकृषकची अट पूर्ण होत नाही. येथील १० टक्के जमीनसुद्धा अकृषक नाही. सोबत विरोध करणाऱ्या गावामधील जवळपास ९ हजार ४४० लोकांंनी पालिकेला विरोध केला आहे. नागभीड पालिका जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार हमीची कामे बंद झालेली आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतची कामेसुद्धा ठप्प झालेली आहेत. यासाठी ग्रामपंचायतकडे निधी आहे. मात्र कामे करता येत नाही. गावकऱ्यांना रोजगार हमीच्या कामाची प्रतीक्षा आहे.सोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांपासून शेतकरी बांधवांना मुकावे लागणार आहे. यातील बहुतेक गावांमध्ये एका वर्षांपूर्वीच निवडणुका झाल्या आहेत. ज्या गावांत महिला सरपंच आहेत, त्यांचीही पदे आता गोठविण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)